शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

हजारो राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आले गंडांतर; कायदा मोडून निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 07:44 IST

३० जूनची मुदत पाच दिवसांपूर्वीच संपली. सध्या बदल्यांबाबत कोणताही आदेश लागू नाही. अधिनियमानुसार बदल्यांची ३१ मे ही मुदत केव्हाच संपली आहे

मुंबई  : हजारो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आधीच्या सरकारच्या आदेशामुळे आलेले गंडांतर नवीन सरकारमध्ये टळणार का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. हे गंडांतर टाळायचे, तर बदलीचा कायदा मोडून सरकारला निर्णय घ्यावा लागेल. 

बदली अधिनियम २००५ नुसार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान केल्या जातात. त्यानुसार बदल्या करणे सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारने मे मध्ये असा आदेश काढला की, ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करू नयेत. बऱ्याच विभागांनी बदल्यांसाठीचे पर्याय कर्मचाऱ्यांकडून मागविले होते; पण सरकारच्या त्या आदेशामुळे बदल्या थांबल्या. केवळ प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच ती करता येईल, असेही मे मधील आदेशात म्हटले होते. बदली अधिनियमाच्या त्या आदेशामुळे राज्य सरकारनेच उल्लंघन केले होते. अनेक विभागांमध्ये त्यामुळे नाराजी पसरली होती. तथापि, बदल्यांमध्ये होणाऱ्या अर्थपूर्ण हालचाली थंडावल्या होत्या.

३० जूनची मुदत पाच दिवसांपूर्वीच संपली. सध्या बदल्यांबाबत कोणताही आदेश लागू नाही. अधिनियमानुसार बदल्यांची ३१ मे ही मुदत केव्हाच संपली आहे. त्यामुळे आता सरकारला नियमित/सर्वसाधारण बदल्या करायच्या असतील, तर नव्याने आदेश काढावा लागणार आहे. हे करतानादेखील बदली अधिनियमाचे उल्लंघनच होणार आहे. कारण ३१ मे नंतरच्या तारखेतच बदल्या कराव्या लागतील. बदलीप्राप्त हजारो कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत ताटकळले आहेत. नियमित बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याही आधीच्या सरकारच्या विचित्र आदेशामुळे यंदा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

राज्य सरकारने नव्याने आदेश काढून कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी आमची मागणी आहे. तसे केले नाही, तर बदल्यांसाठी पात्र कर्मचाऱ्यांवर तो मोठा अन्याय असेल. - ग. दि. कुलथे, अधिकारी महासंघाचे नेते

आता सरकारने केवळ विनंती व निकडीच्या बदल्या कराव्यात. सरसकट बदल्या या पुढील मे मध्ये करणेच उचित ठरेल. कारण आता कर्मचाऱ्यांच्या बदल्या जुलै, ऑगस्टमध्ये केल्या, तर त्यांच्या पाल्यांच्या शाळा प्रवेशाची मोठीच अडचण होईल.- विश्वास काटकर, सरचिटणीस, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :Mantralayaमंत्रालय