शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

हजारो राज्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आले गंडांतर; कायदा मोडून निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 07:44 IST

३० जूनची मुदत पाच दिवसांपूर्वीच संपली. सध्या बदल्यांबाबत कोणताही आदेश लागू नाही. अधिनियमानुसार बदल्यांची ३१ मे ही मुदत केव्हाच संपली आहे

मुंबई  : हजारो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवर आधीच्या सरकारच्या आदेशामुळे आलेले गंडांतर नवीन सरकारमध्ये टळणार का? याबाबत कमालीची उत्सुकता आहे. हे गंडांतर टाळायचे, तर बदलीचा कायदा मोडून सरकारला निर्णय घ्यावा लागेल. 

बदली अधिनियम २००५ नुसार कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान केल्या जातात. त्यानुसार बदल्या करणे सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारने मे मध्ये असा आदेश काढला की, ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करू नयेत. बऱ्याच विभागांनी बदल्यांसाठीचे पर्याय कर्मचाऱ्यांकडून मागविले होते; पण सरकारच्या त्या आदेशामुळे बदल्या थांबल्या. केवळ प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच ती करता येईल, असेही मे मधील आदेशात म्हटले होते. बदली अधिनियमाच्या त्या आदेशामुळे राज्य सरकारनेच उल्लंघन केले होते. अनेक विभागांमध्ये त्यामुळे नाराजी पसरली होती. तथापि, बदल्यांमध्ये होणाऱ्या अर्थपूर्ण हालचाली थंडावल्या होत्या.

३० जूनची मुदत पाच दिवसांपूर्वीच संपली. सध्या बदल्यांबाबत कोणताही आदेश लागू नाही. अधिनियमानुसार बदल्यांची ३१ मे ही मुदत केव्हाच संपली आहे. त्यामुळे आता सरकारला नियमित/सर्वसाधारण बदल्या करायच्या असतील, तर नव्याने आदेश काढावा लागणार आहे. हे करतानादेखील बदली अधिनियमाचे उल्लंघनच होणार आहे. कारण ३१ मे नंतरच्या तारखेतच बदल्या कराव्या लागतील. बदलीप्राप्त हजारो कर्मचारी बदल्यांच्या प्रतीक्षेत ताटकळले आहेत. नियमित बदलीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याही आधीच्या सरकारच्या विचित्र आदेशामुळे यंदा होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

राज्य सरकारने नव्याने आदेश काढून कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, अशी आमची मागणी आहे. तसे केले नाही, तर बदल्यांसाठी पात्र कर्मचाऱ्यांवर तो मोठा अन्याय असेल. - ग. दि. कुलथे, अधिकारी महासंघाचे नेते

आता सरकारने केवळ विनंती व निकडीच्या बदल्या कराव्यात. सरसकट बदल्या या पुढील मे मध्ये करणेच उचित ठरेल. कारण आता कर्मचाऱ्यांच्या बदल्या जुलै, ऑगस्टमध्ये केल्या, तर त्यांच्या पाल्यांच्या शाळा प्रवेशाची मोठीच अडचण होईल.- विश्वास काटकर, सरचिटणीस, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :Mantralayaमंत्रालय