शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

विंदा करंदीकर जन्मशताब्दीवर्ष: स्वेदगंगेपासून मृदगंधपर्यंत 'सतत देत राहाणारा' कवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 13:36 IST

विंदांना 2006 साली 39 वा ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना केशवसुत पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरु लिटररी अॅवॉर्ड, कबिर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

मुंबई- गोविंद विनायक करंदीकर असं मूळ नाव असलं तरी त्यांना सर्व वाचकांनी आणि कविताप्रेमींनी विंदा करंदीकर अशाच नावाने ओळखलं. 23 ऑगस्ट 1918 रोजी सिंधुदुर्गातील एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या विंदांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आयुष्यभरात एक शिक्षक, कवी, लेखक, अनुवादक आणि साहित्य आस्वादक अशा निरनिराळ्या भूमिका पार पाडणाऱ्या विंदांच्या अनेक कविता आजही आपल्या ओठांवर आहेत. विंदांना 2006 साली 39 वा ज्ञानपिठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना केशवसुत पुरस्कार, सोव्हिएट लँड नेहरु लिटररी अॅवॉर्ड, कबिर सन्मान असे अनेक पुरस्कार मिळाले होते. स्वेदगंगा, मृदगंध, जातक, विरुपिका, धृपद हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. राणीचा बाग, सश्याचे कान आणि परी गं परी अशी त्यांनी लहान मुलांसाठीही पुस्तकं लिहिली. स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.आज जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अनेक गाजलेल्या कवितांचे स्मरण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.विंदांची देणाऱ्याने देत जावे ही एक सर्वमान्यता लाभलेली सुप्रसिद्ध कविता आहे.

देणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावेहिरव्यापिवळ्या माळावरूनहिरवीपिवळी शाल घ्यावी,सह्याद्रीच्या कड्याकडूनछातीसाठी ढाल घ्यावीवेड्यापिशा ढगाकडूनवेडेपिसे आकार घ्यावेरक्तामधल्या प्रश्नांसाठीपृथ्वीकडून होकार घ्यावेउसळलेल्या दर्याकडूनपिसाळलेली आयाळ घ्यावीभरलेल्याश्या भीमेकडूनतुकोबाची माळ घ्यावीदेणाऱ्याने देत जावेघेणाऱ्याने घेत जावेघेता घेता एक दिवसदेणाऱ्याचे हात घ्यावेत

याबरोबरच समाजाच्या एकूण स्थितीवर भाष्य करणारी त्यांची सब घोडे बारा टक्के ही कविता आजही तितकीच विचार करायला लावणारी आहे..जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते;कोणी मवाळ कोणी जहाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठकोणी ढीले कोणी घट्ट; कोणी कच्चे कोणी पक्केसब घोडे बारा टक्के!गोड गोड जुन्या थापा (तुम्ही पेरा तुम्ही कापा)जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग;तुम्ही तरी काय करणार? आम्ही तरी काय करणार?त्याच त्याच खड्ड्या मधे पुन्हा पुन्हा तोच पाय;जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के!जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी;(जिकडे टक्के तिकडे टोळी) ज्याचा पैसा त्याची सत्तापुन्हा पुन्हा हाच कित्ता; पुन्हा पुन्हा जुनाच वारमंद घोडा जुना स्वार; याच्या लत्ता त्याचे बुक्केसब घोडे बारा टक्के!सब घोडे! चंदी कमी; कोण देईल त्यांची हमी?डोक्यावरती छप्पर तरी; कोण देईल माझा हरी?कोणी तरी देईन म्हणा मीच फसविन माझ्या मना!भुकेपेक्षा भ्रम बरा; कोण खोटा कोण खरा?कोणी तिऱ्या कोणी छक्के; सब घोडे बारा टक्के!

समाजातील संवेदनहीन परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी माझ्या मना बन दगड  या कवितेतून भावना व्यक्त केल्या होत्या...

हा रस्ता अटळ आहे !अन्नाशिवाय, कपड्याशिवायज्ञानाशिवाय, मानाशिवायकुडकुडणारे हे जीव पाहू नको, डोळे शिव!नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भासछातीमधे अडेल श्वास,विसर यांना दाब कढमाझ्या मना बन दगड!हा रस्ता अटळ आहे !ऐकू नको हा आक्रोशतुझ्या गळ्याला पडेल शोषकानांवरती हात धरत्यांतूनही येतील स्वरम्हणून म्हणतो ओत शिसेसंभाळ, संभाळ, लागेल पिसे!रडणाऱ्या रडशील किती?झुरणाऱ्या झुरशील किती?पिचणाऱ्या पिचशील किती?ऐकू नको असला टाहोमाझ्या मना दगड हो!हा रस्ता अटळ आहे !येथेच असतात निशाचरजागोजाग रस्त्यावरअसतात नाचत काळोखात;हसतात विचकून काळे दातआणि म्हणतात, कर हिंमतआत्मा विक उचल किंमत!माणूस मिथ्या, सोने सत्यस्मरा त्याला स्मरा नित्य! भिशील ऐकून असले वेदबन दगड नको खेद!बन दगड आजपासूनकाय अडेल तुझ्यावाचूनगालावरचे खारे पाणीपिऊन काय जगेल कोणी?काय तुझे हे निःश्वासमरणाऱ्याला देतील श्वास?आणिक दुःख छातीफोडेदेईल त्यांना सुख थोडे?आहे तेवढे दुःखच फारमाझ्या मना कर विचारकर विचार हास रगडमाझ्या मना बन दगडहा रस्ता अटळ आहे !अटळ आहे घाण सारीअटळ आहे ही शिसारीएक वेळ अशी येईलघाणीचेच खत होईलअन्यायाची सारी शितेउठतील पुन्हा, होतील भुतेया सोन्याचे बनतील सूळसुळी जाईल सारे कूळऐका टापा! ऐका आवाज!लाल धूळ उडते आजत्याच्यामागून येईल स्वारया दगडावर लावील धार!इतके यश तुला रगडमाझ्या मना बन दगड

एटू लोकांचा देशमध्ये ते लहान मुलांच्या अद्भूत विश्वात घेऊन जातात. आज या कवितांना पाच ते सहा दशके झाली असली तरी आजही या कविता सर्वांच्या स्मरणात आहेतच त्याहून त्या पुन्हापुन्हा वाचाव्याश्या वाटतात.

‘तिबेटाच्याजरा खालीहिमालयाच्याजरा वरएटू लोकांचाअद्भुत देशप्रत्येकाजवळउडते घर,टिंग म्हणतायेते खाली,टुंग म्हणताजाते वर..’हे एटू लोक कसे असतात? तर,

‘एटू असतातगोरे, गोरे,एटू असतातछोटे, छोटे.पण पुरुषाच्यापाठीमागेशेपूट असतेफार मोठे.तेच फिरवूनडोक्यावरतीएटू बांधतातछान फेटे..’

 

 

 

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठी