शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या विधानाला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:01 IST

Maharashtra Politics: सामना अग्रलेखावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. सामना अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासंदर्भात केलेल्या विधानांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही, असे म्हटले होते. यावर आता ठाकरे गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. 

सामनातील अग्रलेखाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू दे. आम्ही आमचे काम करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काय करतो, हे त्यांना माहिती नसते. मात्र, आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक असते, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर मीडियाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 

सामनातील अग्रलेख खासदार संजय राऊत लिहितात

सामनातील अग्रलेख खासदार संजय राऊत लिहितात. राजकारण आणि समाजकारण याचा गाढा अभ्यास असलेले संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच ते त्यांचे विचार ‘सामना’तून मांडत असतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच “सामनातील अग्रलेख कोणी गांभीर्याने घेवो अथवा न घेवो. मात्र, माध्यमांची रोजच्या दिवसाची सुरुवात ‘सामना’च्या अग्रलेखानेच होते, हे सुद्धा नाकारता येत नाही, असे विनायक राऊत म्हणाले. 

दरम्यान, शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली होती.  

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत