शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही; शरद पवारांच्या विधानाला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:01 IST

Maharashtra Politics: सामना अग्रलेखावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखावरून महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. सामना अग्रलेखात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यासंदर्भात केलेल्या विधानांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘सामना’तील अग्रलेखाला महत्त्व देत नाही, असे म्हटले होते. यावर आता ठाकरे गटातील नेत्याने प्रत्युत्तर दिले आहे. 

सामनातील अग्रलेखाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू दे. आम्ही आमचे काम करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काय करतो, हे त्यांना माहिती नसते. मात्र, आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक असते, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर मीडियाशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. 

सामनातील अग्रलेख खासदार संजय राऊत लिहितात

सामनातील अग्रलेख खासदार संजय राऊत लिहितात. राजकारण आणि समाजकारण याचा गाढा अभ्यास असलेले संपादक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच ते त्यांचे विचार ‘सामना’तून मांडत असतात”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच “सामनातील अग्रलेख कोणी गांभीर्याने घेवो अथवा न घेवो. मात्र, माध्यमांची रोजच्या दिवसाची सुरुवात ‘सामना’च्या अग्रलेखानेच होते, हे सुद्धा नाकारता येत नाही, असे विनायक राऊत म्हणाले. 

दरम्यान, शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली होती.  

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊत