शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महाविकास आघाडीचे सरकार तीन तोंडाचे; विनायक मेटेंची 'ठाकरे सरकारवर' टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 09:56 IST

सत्तास्थापनेच्या आधी या मित्रपक्षांना आश्वासनं वेगळी दिली आणि आता जेव्हा करायची वेळ आली, तेव्हा महाविकास आघाडी सरकाराला त्या आश्वासनांचा विसर पडला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात सोमवारी ३६ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यांनतर आता विरोधी पक्षाकडून ठाकरे सरकारवर टीका होताना पाहायला मिळत आहे. 'हे सरकार तीन तोंडाचे आहे', असे म्हणत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी ते बोलत होते.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले निकालानंतर एकत्र आले. यात शिवसेनेसोबत मित्रपक्ष आले नसले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती. त्यामुळे राज्याच्या मंत्रीमंडळात आपलीही वर्णी लागेल अशी आशा मित्रपक्षांना होती. मात्र पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मित्रपक्ष उपेक्षित राहिले आहेत. तर याच मुद्यावरून विनायक मेटेंनीमहाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

मेटे म्हणाले की, आधीच या तीन पक्षाचे तीन तोंडं आहेत. त्यामध्ये तिन्ही पक्षांचे वेगवेगळे मित्रपक्ष आहेत. तर सरकार स्थापन करण्यासाठी या तीन पक्षांच्या मित्रपक्षांनी मदत केली होती. सत्तास्थापनेच्या आधी या मित्रपक्षांना आश्वासनं वेगळी दिली आणि आता जेव्हा करायची वेळ आली, तेव्हा महाविकास आघाडी सरकाराला त्या आश्वासनांचा विसर पडला आहे. त्यामुळे याचा परिणाम निश्चितच येणाऱ्या काळात होईल, असं म्हणत विनायक मेटेंनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीVinayak Meteविनायक मेटेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना