ग्रामसभेत गावठी पिस्तुलाने थरार
By Admin | Updated: October 2, 2015 00:18 IST2015-10-02T00:18:43+5:302015-10-02T00:18:43+5:30
तालुक्यातील गेवराई गावाच्या ग्रामसभेत महिला सरपंचाच्या पतीच्या कानशिलाला गावठी पिस्तुल लावण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

ग्रामसभेत गावठी पिस्तुलाने थरार
नेवासा (जि. अहमदनगर) : तालुक्यातील गेवराई गावाच्या ग्रामसभेत महिला सरपंचाच्या पतीच्या कानशिलाला गावठी पिस्तुल लावण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
पांडुरंग सतरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. ग्रामसभेचे चित्रीकरण करणे सक्तीचे असले, तरी या ग्रामसभेचे चित्रीकरण नष्ट केले गेल्याचे उघड
होत आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर होऊन नवीन सदस्य निवडून आले होते. सरपंच व उपसरपंच निवडीनंतर झालेल्या पहिल्या ग्रामसभेत सरपंच निर्मला पांडुरंग सतरकर यांच्याऐवजी त्यांचे पती पांडुरंग किसन सतरकर (वय ३३) हे बोलण्यासाठी उभे राहिले असता ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेले संदीप रूपचंद कर्डिले यांनी पळतच व्यासपीठाच्या दिशेने येऊन पांडुरंग सतरकर यांच्या कानशिलाला पिस्तुल लावून ‘तू भाषण करण्याचे कारण काय?’ असे म्हणून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. नंतर संदीपने पिस्तुल शंकर भारमन यांच्याकडे देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
सतरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत संदिप कर्डिले, कपूर कर्डिले, अनिल कर्डिले, गोपीचंद कर्डिले, सचिन कर्डिले, शंकर आदमने, प्रवीण कर्डिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन काडतुसे जप्त
करण्यात आली.