शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नगरी दणका; विखे आघाडीला देणार होते 'व्हाईट वॉश', भाजपला 12 पैकी मिळाल्या तीनच जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 19:09 IST

12 जागांपैकी 10 जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडे येण्याची चिन्हे असून भाजपला केवळ दोन जागा मिळण्याची स्थिती आहे. त्यामुळे विखे पाटील यांचे आघाडीला व्हॉईट वॉश देण्याची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - दुसऱ्यांदा भूमिका बदलून काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने नगरी दणका दिला आहे. काँग्रसचे विरोधीपक्ष नेतेपद सोडून भाजपमध्ये जाताच मंत्रीपदी विराजमान झालेल्या विखेंनी नगरमध्ये युतीला 12-0 असा विजय मिळवून देईल अशी घोषणा केली होती. मात्र त्यांच्या या घोषणेला मतदारांनी केराची टोपली दाखवली आहे.

आधी मुलाला भाजपमध्ये पाठवून खासदार केल्यानंतर स्वत: भाजपमध्ये जावून मंत्रीपद घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांवर मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. विखे पाटील यांनीही संपूर्ण झोकात नगरच्या 12 पैकी 12 जागा जिंकून आघाडीला व्हॉईट वॉश देणार असल्याचे सांगितले होते.

शिर्डी मतदार संघातून विजयी झालेल्या विखेंनी त्यानुसार तयारीही केली होती. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांना पराभूत करण्यासाठी राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांनी प्रयत्नाची पराकाष्टा केली होती. मात्र विखे पिता-पुत्रांच्या इराद्यावर पाणी फिरले.

नगरमधील अकोले मतदार संघातून वैभव पिचड पराभूत झाले असून संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विजयी झाले. तर कोपरगावमधून भाजपच्या स्नेहलता कोल्हे पिछाडीवर आहेत. त्याचवेळी श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे, नेवासेमधून शंकरराव गडाख विजयाचे दिशेने असून राहुरीतून शिवाजी कर्डिले पराभूत झाले आहेत. पारनेरमधून काँग्रेसचे निलेश लंके, अहमदनगर शहर मधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी झाले आहेत. तर शिर्डी, शेवगाव आणि श्रीगोंद्यात भाजपला यश मिळाले असून विखे पाटलांसह मोनिका राजळे आणि बबनराव पाचपुते विजयी झाले आहेत.

एकूणच 12 जागांपैकी 9 जागा राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडे आल्या असून एक क्रांतीकारी शेतकरी पार्टी तर भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे विखे पाटील यांची आघाडीला व्हॉईट वॉश देण्याची घोषणा निव्वळ घोषणाच ठरली आहे.