शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

"सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय", लाडकी बहीण योजनेवरही विजय वडेट्टीवारांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 12:46 IST

Vijay Wadettiwar : शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवरूवन राज्य सरकारवर केली आहे.

मुंबई : शेतकऱ्यांचे ४६०० कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत. आपत्तीग्रस्तांच्या नावाला १५ हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत आहे, असा आरोप करत सरकारने लाडकी बहीण योजना जरी काढली असली, तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजनेवरूवन राज्य सरकारवर केली आहे.

शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, मराठवाड्यातून शेतकऱ्यांच्या ३५० डीपी चोरीला गेल्या आहेत. त्यावर सरकारचचे लक्ष नाही. शेतकऱ्यांचे ४६००० कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत. आपत्तीग्रस्तांच्या नावाला १५ हजार कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करत आहे. तसेच, बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी एमआयडीसीच्या नावाने लाटल्या. सरकार केवळ आम्ही खोटे नेरेटिव्ह सेट केले बोलतात. आम्ही काय खोटे नेरेटिव्ह सेट केले, तुम्हीच खोटं बोललात, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

याचबरोबर, लाडकी बहीण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाही. लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारी खात्यातून मत विकत घेणं आहे. आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत. शासकीय योजनेतून मत खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही? निवडणुकीच्या तोंडावरच का सुचली? यातून काही निष्पन्न होणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच, दिक्षाभूमी येथील आंदोलनाबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले, मी दिक्षाभूमीला गेलो होतो. गुन्हे दाखल करण्याची गरज नाही. ही दडपशाही आहे. याबाबत पोलीस आयुक्तांशी बोलून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घ्या आणि सोडा अशी विनंती केली होती, मात्र आता गुन्हे दाखल झाले असतील तर ते मागे घ्यावेत. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही- विजय वडेट्टीवारविधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करेल का? असे विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमचे तीनही उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे. तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाFarmerशेतकरी