शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीतील ओबीसी मेळाव्याला जातोय, विजय वडेट्टीवारांचा यूटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:17 IST

हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी मेळाव्याला जाण्याची आपली भूमिका विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी जाहीर केली.

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. मराठा समाजाबाबतची मंत्री छगन भुजबळांची वक्तव्यं दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे छगन भुजबळ असतील, त्या कोणत्याही मंचावर उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली होती. मात्र, आता विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली असून, उद्या होणाऱ्या हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळांसोबत हजेरी लावणार आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातील ओबीसी मेळाव्याला जाण्याची आपली भूमिका विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी जाहीर केली. हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याची आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. सगळ्या ओबीसी बांधवांनी ही तयारी केली होती. तर, गेल्या दोन दिवसांपासून हजारो ओबीसी बांधवांनी फोनवरून मला मेळाव्याला उपस्थित राहावे अशी विनंती केली, ओबीसी नेत्यांची सुद्धा अशीच भावना आहे. मी भूमिका जाहीर केल्यानंतर मला अनेक फोन आले आणि मेळाव्याचा जाण्याचा आग्रह केला. लोकांच्या आग्रहाखातर हिंगोलीच्या मेळाव्याला मी जातोय, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. 

ओबीसींच्या हितासाठी लढा देणं माझं काम आहे, त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाला जात आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ओबीसीसाठी भुजबळांनी सुद्धा आवश्यकता पडेल तर राजीनामा देण्यासाठी तयार असल्याची भूमिका मांडली आहे. तसेच, ओबीसीच्या हक्कासाठी भेद नको असं म्हणणारे नेते मला भेटले आहे. त्यामुळे, आमच्या भूमिकेमुळे चुकीचा संदेश जाऊ नये, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

याचबरोबर, विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सरकारवर निशाणा साधला. सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही. सरकारमधील तीन पक्षांमध्ये सध्या बेबनाव सुरु आहे. तिघांच्या मनामध्ये ऑलवेल की अलबेल, हे मी लवकरच सांगेन. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्यांवर आरोप करतो. २० मंत्री एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. एकमेकांच्या फाईली अडवा आणि जिरवा, असा उद्योग सर्रास सुरु आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

याशिवाय, जालना येथील आंतरवाली सराटी प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांच्या आदेशशिवाय लाठीमार होणे शक्य नव्हते. त्यांच्यावर कारवाई आवश्यक आहे. तसेच, फक्त ओबीसी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली व इतरांवर झाली नसल्याचा चुकीचा संदेश जाईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

पाच दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?ओबीसींच्या आरक्षण लढ्यात दोन समाजामध्ये विष पेरणं चुकीचं आहे. त्यामुळे यापुढे मी भुजबळांच्या मंचावर कुठल्याही कार्यक्रमात जणार नाही. सत्तेतल्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात, दोन समाजामध्ये विष पेरणं सोपं आहे परंतु त्यातून कुणाचा जीव गेला तर कोण जबाबदार? दोन समाज भिडल्याने राज्यकर्त्यांना आनंद मिळणार आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारChhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणHingoliहिंगोली