शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:51 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, २२ ते २६ ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या ‘रिग्रेट’ दाखवत आहेत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, २२ ते २६ ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या ‘रिग्रेट’ दाखवत आहेत. रेल्वेने केलेल्या विशेष गाड्यांची अवस्थाही सामान्य गाड्यांप्रमाणेच झाल्याने चाकरमान्यांची वाट खडतर झाली आहे. महामुंबईतून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने गणपतीकरिता गावी पोहोचायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)वरून सावंतवाडी, रत्नागिरी, मडगाव या मार्गांवर ८ एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. याद्वारे १९४ दुहेरी फेऱ्या नियोजित केल्या आहेत. मुंबईमधून जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण २४ जुलैपासून सुरू केले. परंतु, या सर्वच गाड्यांचे कन्फर्म तिकीट आरक्षण सुरू होताच फुल्ल झाले आहे. २२ ते २६ ऑगस्टपर्यंतची  ऑनलाइन तिकीट विक्री पहिल्या तीन मिनिटांमध्ये फुल्ल झाली. दुसरीकडे तिकीट खिडक्यांवरही तासन् तास थांबूनही तिकीट मिळत नसल्याचे चाकरमानी हवालदिल झाले. त्यामुळे रेल्वेने आणखी विशेष गाड्यांची घोषणा करावी, अशी मागणी चाकरमान्यांकडून करण्यात येत आहे.

...तर सर्वांना कन्फर्म तिकीट मिळेल रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली. परंतु, त्यांनी महिनाभराच्या अंतराने रोज एक दिवसाचे बुकिंग खुले केले असते तर सर्वांना तिकीट काढणे शक्य झाले असते. उदा. २४ जुलै रोजी २३ ऑगस्टचे बुकिंग खुले करणे. सर्व विशेष गाड्यांचे बुकिंग एकाच दिवशी खुले केल्याने गोंधळ उडाला असून, सर्व गाड्या रिग्रेट झाल्या असल्याचे अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे सचिव अक्षय महापदी यांचे म्हणणे आहे. 

या गाड्यांचे आरक्षण फुल्ल सीएसएमटी - सावंतवाडी २ गाड्या    २४ ते २६ ऑगस्ट सीएसएमटी - रत्नागिरी    २४ ते २६ ऑगस्ट एलटीटी- सावंतवाडी ३ गाड्या    २३ ते २६ ऑगस्टएलटीटी - मडगाव २ गाड्या    २३ ते २६ ऑगस्ट

हजारो चाकरमानी वेटिंगवर एलटीटी - सावंतवाडी गाडीचे २२ तारखेचे वेटींग गुरुवारी रात्री ९ वाजता तपासले असता २४४ इतके होते. तर सीएसएमटी- सावंतवाडी गाडीचे २२ आणि २३ तारखेचे वेटींग त्याच वेळेत २३० पेक्षा अधिक होते.

पुन्हा क्षमतेपेक्षा जास्त वेटिंग रेल्वेगाड्यांच्या १ जुलैनंतर आरक्षित होणाऱ्या वेटिंग तिकीट विक्रीवर रेल्वे प्रशासनाने मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे गाडीतील एकूण आसनक्षमतेपेक्षा केवळ २५ टक्केच वेटिंग तिकिटांची विक्री करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. परंतु, मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांपैकी एलटीटी - सावंतवाडी गाडीचे वेटिंग तिकीट ११०१ असल्याचे प्रवाशांनी सांगितले. तिकीट कन्फर्म नाही झाल्यास याचा भुर्दंड मात्र प्रवाशांवर लादला जाणार आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGaneshotsavगणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्र