शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

हा अर्थसंकल्प म्हणजे 'खोटं नरेटिव्ह'! फडणवीसांच्याच शब्दात उद्धव ठाकरेंची टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 16:46 IST

Political Reaction on Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत गाजर दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे असं म्हटलं आहे. 

मुंबई - निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असेच अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल अशा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की,  गेल्या लोकसभा निवडणुकीत १० वर्षातील भाजपाच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून चीडलेल्या महाराष्ट्राने जो दणका दिला त्यातून सत्ताधाऱ्यांचे डोळे किलकिले झाल्यासारखं वाटतायेत. जनता यांच्या थापांवर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी, सुजाण आणि सज्ञान आहे. कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेण्याचे षडयंत्र उघड झालं आहे. महाराष्ट्र हा गुजरातच्या पाठी गेला आहे. काही तरी धुळफेक करायची, जनतेला फसवायचं, खोटं रेटून बोलायचे आणि महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर यायचं हा यांचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच वारकऱ्यांना विकत घेण्याची परंपरा अर्थसंकल्पातून होतेय का, हा वारकऱ्यांचा अपमान आहे. देहभान विसरून विठुरायाच्या गजरात ते दिंडीत जात असतात. त्यांना पैशाची काही देणं घेणं नसते. मंदिराचा कळस बघून वारकरी दर्शन घेतात. त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही. त्याशिवाय मौलाना आझाद महामंडळाचा निधी वाढवलाय, त्यामुळे आता सरकारने निवडणुका बघून हिंदुत्व सोडलं का याचेही उत्तर सरकारने द्यावे. विधानसभा निवडणुका कधी होतायेत याची जनता वाट बघतेय. अर्थसंकल्पात सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. निवडणूक झाल्यानंतर हा सगळा जुमला होता असं बोलतील. हा अर्थसंकल्प आहे की जुमला संकल्प, या जुमलेबाजीला जनता फसणार नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना जनता पुन्हा सत्तेत आणणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली आहे. 

दरम्यान, अर्थसंकल्पातील योजनांसाठी आर्थिक तरतूद कशी करणार हा प्रश्न आहे. आजपर्यंत त्यांनी ज्या घोषणा केल्या त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या त्याबद्दल तज्ज्ञांची समिती नेमून त्याची श्वेतपत्रिका काढावी. अनेक घोषणा झाल्या परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. या अर्थसंकल्पाचं वैशिष्टे म्हणजे महिलांना मतदानात आपल्या बाजूला वळवण्याचा केविळवाणा प्रयत्न आहे. मुलगा आणि मुलगी भेदभाव करू नका याबद्दल कुठेही वाच्यता नाही. माताभगिनींना जे देताय जरूर द्या, हजारो तरूण बेरोजगार आहेत. रोजगारवाढीसाठी कुठेही उपाययोजना नाही असंही ठाकरेंनी म्हटलं. 

काँग्रेसचा हवाला देत भाजपावर टीका

शेतकऱ्यांना वीजबिल माफ करा अशी मागणी मी केली होती ती सरकारने मान्य केली. परंतु शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी मान्य केली नाही. वीजबिल माफी ही थकबाकीसह माफ करणार आहात का? काँग्रेस काळात निवडणुकीपूर्वी ज्याप्रकारे वीजबिल माफी केली होती, पुन्हा सत्तेत आल्यानंतर महिनाभरात दाम दुपट्टीने वीजबिल भरणा करा अशी दरडावणी सुरू झाली. तशीच ही दिसते. शेतकऱ्यांना एकाबाजूला लुटायचे आणि दुसऱ्या बाजूला उदारपणाचा भाव आणायचा असं सरकारचे धोरण आहे. या खोट्या मलमपट्ट्यांनी शेतकरी शांत होतील असं वाटत असेल तर ते अजिबात होणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र