शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

दिवाळीनंतरच बाेटाला शाई! विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये, निकाल नोव्हेंबरमध्ये

By यदू जोशी | Updated: August 13, 2024 05:42 IST

नवी विधानसभा नोव्हेंबरच्या अखेरीस अस्तित्वात येणार, पावसाळ्यात प्रचारामधील अडचणींचा मुद्दा कळीचा

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानले जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल, अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे. नियमानुसार नवीन विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात येणार आहे, त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता, प्रचाराचा धुराळा कशासाठी, असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळेच दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. 

नवीन विधानसभेचे पहिले अधिवेशन ज्या दिवशी होते त्या दिवसापासून पाच वर्षे ती विधानसभा अस्तित्वात असते. २०१९ मधील निवडणुकीनंतर राज्यात नाट्यपूर्ण राजकीय घटना घडल्या होत्या. 

आयोगात तूर्त हालचाली नाहीत

- महायुतीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले की, पावसाळ्यात निवडणूक प्रचारात अनेक अडचणी येतील, शेतीची कामेही मोठ्या प्रमाणात सुरू असतात. - सणासुदीच्या तोंडावर निवडणूक घेण्याऐवजी दिवाळीनंतर ती घ्यावी, असा सत्तारुढ महायुतीमध्येदेखील सूर आहे. अर्थात अंतिम निर्णय हा निवडणूक आयोगाचा असेल. मात्र, तूर्त आयोगात याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.

१४ वा १५ नोव्हेंबरला लागू शकतो निकाल

आचारसंहिता लागू झाल्यानंतर साधारणत: ४५ दिवसांनी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित असते. येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी ४५ दिवस म्हणजे १२ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तरी विहित कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दिवाळी ३ नोव्हेंबर रोजी संपेल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल. १४ किंवा १५ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे पहिले अधिवेशन बोलावण्याकरिता त्यानंतर १२ दिवस हाती असतील. 

...तर महायुतीला मिळणार आणखी २ महिने

नोव्हेंबरमध्ये निवडणूक घ्या, अशी विनंती सत्तापक्षाकडून आयोगाला केली जाण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर निवडणूक झाली तर महायुती सरकारला आणखी दोन महिने मिळतील. त्यात आणखी निर्णय, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन, प्रारंभ करता येणार आहे.

२६ नोव्हेंबर अखेरचा दिवस का?

२०१९च्या निकालानंतर कुणीही सत्तास्थापनेचा दावा केला नाही. त्यानंतर लागू झालेली राष्ट्रपती राजवट २२ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर उठविण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, पण पवार परत गेले आणि सरकार कोसळले. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आले. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २७ नोव्हेंबरला नवीन आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन झाले होते. त्यामुळे कायद्यानुसार त्या तारखेपासून पुढची पाच वर्षे म्हणजे २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ही विधानसभा अस्तित्वात असेल. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग