शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

परंडातून आमदार मोटे विजयाचा चौकार लावणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 12:31 IST

गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत सलग आमदार मोटेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत मतदारसंघाच नेतृत्व आपल्याकडे कायम ठवले.

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीचे वार वाहू लागले असून, राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. गेल्या तीन वेळापासून या मतदारसंघात राष्ट्रवादीने आमदार राहुल मोटेंच्या रूपाने आपला गड कायम ठेवला आहे. मात्र यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे या मतदारसंघातून रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याने, आमदार मोटे विजयाचा चौकार लावणार का ? अशी राजकीय चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

परंडा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत सलग मोटेंनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत मतदारसंघाच नेतृत्व आपल्याकडे कायम ठवले. २०१४ मध्ये मोदी लाटेत सुद्धा मोटे यांनी ७८ हजार ५४८ मते मिळवत १२ हजार ३८९ मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी त्यांचाकडेच राहणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.

मात्र असे असलेही तरीही, परंडा मतदारसंघातून हॅटट्रिक करणाऱ्या मोटे यांच्यासमोर यावेळी शिवसेनेचे तगडे आव्हान असणार आहे. कारण या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत चाचपणी करत आहेत. विशेष म्हणजे सावंत यांनी मतदारसंघात विकास कामांचा धडाकाच लावला आहे. कारखानदारीच्या माध्यमातून राजकरणात आलेल्या सावंत यांनी मतदारसंघात चांगली पकड निर्माण केली आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत परंडा मतदारसंघातून ते जोर लावणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आमदार मोटे विजयाचा चौकार लावणार की सावंत हे विधानसभेत आपला खात खोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गेल्यावेळी भाजप-शिवसेना वेगवेगळी लढल्याने मतांचे विभाजन झाले होते. मात्र जर यावेळी या दोन्ही पक्षात युती झाली तर, याचा फायदा सुद्धा सावंत यांना होणार आहे. त्यामुळे युतीचा निर्णय परंडा मतदारसंघातील राजकीय फेरबदल करू शकते अशी चर्चा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. मात्र सत्ता नसतानाही आमदार मोटे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती यांच्या माध्यमातून निधी खेचून आणत जनसंपर्क कायम ठेवला असल्याने त्याचा फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळे परंडा मतदारसंघातील जनता कुणाला खुर्ची तर कुणाला मिर्ची देणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.