शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Vidhan Sabha 2019: तिकिटांची कापाकापी तेव्हाची अन् आताची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 00:21 IST

१९७८ ला इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून इंदिरा काँग्रेसची स्थापना केली होती.

- दिनकर रायकर

भाजपने यंदा काही नेत्यांना कसे घरी बसविले, याची चर्चा जोरात सुरू आहे. त्याबद्दल काही जण त्या पक्षाचे कौतुक करीत आहेत, तर विरोधी पक्ष त्यावर टीका करीत आहेत. पण सत्तारुढ पक्षाने मंत्री किंवा आमदारांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकीटे कापण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यात १९८५ सालच्या विधानसभा निवडणुकांत त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी निम्म्यांहून अधिक मंत्री व आमदारांची तिकीटे कापली होती. त्यावेळी वृत्तपत्रांनी या बातम्यांना ‘मध्यरात्रीचे शिरकाण’ असे वर्णन केले होते.

१९७८ ला इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून इंदिरा काँग्रेसची स्थापना केली होती. ज्याला ‘काँग्रेस आय’ म्हणून ओळखले जात होते. जे लोक काँग्रेस आयमध्ये नव्हते, त्यांना रेड्डी काँग्रेस मधील म्हणून ओळखले जात होते. पुढे रेड्डी काँग्रेसमधील वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आदी दिग्गजांसह अनेक नेतेही काँग्रेस आयमध्ये आले. त्यानंतर १९८० साली लोकसभा व नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आयचा विजय झाला. तरीही काँग्रेस आयचे मूळ निष्ठावान आणि नंतर आलेल्या रेड्डी काँग्रेसचे निष्ठावान यांच्यात दोन गट पडले. त्यांच्यात शितयुद्ध सुरू झाले होते.

हे शीतयुद्ध १९८० ते १९८५ असे चालूच होते. या काळात मूळ निष्ठावंतामधील बॅ. ए. आर. अंतुले आणि बॅ. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होऊन गेले होते. मात्र रेड्डी काँग्रेसमधून आलेल्या वसंतदादांनी राजकारण करत मूळ निष्ठावंतांना डावलून स्वत: मुख्यमंत्रीपद मिळवले होते. इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि काही महिन्यांनी, मार्च १९८५ ला महाराष्टÑात विधानसभा निवडणुका लागल्या. त्यावेळी वसंतदादांनी राजीव गांधी यांच्याकडे आपले वजन वापरुन मूळ निष्ठावंत काँग्रेसच्या अर्ध्याहून अधिक मंत्री व नेत्यांची तिकीटे कापली होती. इंदिरा गांधी नसल्यामुळे तिकीट कापले गेलेल्यांचे ऐकून घेण्यासही कोणी नव्हते, याचा अचूक राजकीय लाभ वसंतदादांनी उचलला होता.

काँग्रेस आयमधील मूळ निष्ठावंतांनी वसंतदादांच्या विरोधात डॉ. बळीराम हिरे यांना तुम्हीच आमचे नेते म्हणत, त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करणे सुरूकेले होते. ही खेळी हाणून पाडण्यासाठी वसंतदादांनी डॉ. बळीराम हिरे यांचेच तिकीट कापून टाकले. ही खेळी एवढी जबरदस्त होती की वसंतदादा आणि बळीराम हिरे दोघे रात्री उशिरा एकाच विमानाने दिल्लीहून मुंबईत आले. विमानातच त्यांनी हिरे यांना तुमचे तिकीट पक्षश्रेष्ठींनी नाकारले आहे हे सांगून टाकले. शिवाय दिल्लीतही वसंतदादांनी जबरदस्त फिल्डींग लावली होती.

तिकीट नाकारल्याचे कळताच डॉ. हिरे सकाळी दिल्लीत फोनाफोनी करतील आणि ए/बी फॉर्म्स मिळवण्याचा प्रयत्न करतील हे त्यांना माहीत होते. त्यामुळे ज्यांच्याकडे हिरे फोन करणार होते, त्याच महाराष्टÑाच्या प्रभारी असलेल्या नेत्याला दादांनी कळविले की, डॉ. हिरे यांचा फोन आला की तो तुम्ही घेऊ च नका. परिणामी हिरे यांना उमेदवारी अर्जही भरता आला नाही आणि दादांच्या मार्गातील मुख्यमंत्रीपदाचा अडसर असा दूर केला गेला. मात्र हे करताना दादांनी हिरे यांच्या पत्नी इंदिरा हिरे यांना उमेदवारी देऊन उरला सुरला विरोधही कमी करुन टाकला होता. आपण काँग्रेसला बहुमत मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी राजीव गांधी यांना दिली होती व त्यांना स्वत:लाही तशी ठाम खात्री असल्यामुळेच ते ही खेळी करू शकले.

या निवडणुकीत भाजपने १९८५ च्या काँग्रेसप्रमाणेच खेळी गेली. विजयाची पूर्ण खात्री झाल्याने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रकाश मेहता आदी मंत्री व अनेक आमदारांना दूर सारले. एकनाथ खडसे यांच्या मुलीला तिकीट देऊन त्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी पुरेसे वा पोषक काम न करणाऱ्यांना हा एका प्रकारे श्रेष्ठींनी दिलेला इशाराच आहे! ही तिकिटे कापण्यात दिल्लीचा हात आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्र