शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Vidhan Sabha 2019: तिकिटांची कापाकापी तेव्हाची अन् आताची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 00:21 IST

१९७८ ला इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून इंदिरा काँग्रेसची स्थापना केली होती.

- दिनकर रायकर

भाजपने यंदा काही नेत्यांना कसे घरी बसविले, याची चर्चा जोरात सुरू आहे. त्याबद्दल काही जण त्या पक्षाचे कौतुक करीत आहेत, तर विरोधी पक्ष त्यावर टीका करीत आहेत. पण सत्तारुढ पक्षाने मंत्री किंवा आमदारांची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकीटे कापण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यात १९८५ सालच्या विधानसभा निवडणुकांत त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी निम्म्यांहून अधिक मंत्री व आमदारांची तिकीटे कापली होती. त्यावेळी वृत्तपत्रांनी या बातम्यांना ‘मध्यरात्रीचे शिरकाण’ असे वर्णन केले होते.

१९७८ ला इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून इंदिरा काँग्रेसची स्थापना केली होती. ज्याला ‘काँग्रेस आय’ म्हणून ओळखले जात होते. जे लोक काँग्रेस आयमध्ये नव्हते, त्यांना रेड्डी काँग्रेस मधील म्हणून ओळखले जात होते. पुढे रेड्डी काँग्रेसमधील वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आदी दिग्गजांसह अनेक नेतेही काँग्रेस आयमध्ये आले. त्यानंतर १९८० साली लोकसभा व नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आयचा विजय झाला. तरीही काँग्रेस आयचे मूळ निष्ठावान आणि नंतर आलेल्या रेड्डी काँग्रेसचे निष्ठावान यांच्यात दोन गट पडले. त्यांच्यात शितयुद्ध सुरू झाले होते.

हे शीतयुद्ध १९८० ते १९८५ असे चालूच होते. या काळात मूळ निष्ठावंतामधील बॅ. ए. आर. अंतुले आणि बॅ. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होऊन गेले होते. मात्र रेड्डी काँग्रेसमधून आलेल्या वसंतदादांनी राजकारण करत मूळ निष्ठावंतांना डावलून स्वत: मुख्यमंत्रीपद मिळवले होते. इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि काही महिन्यांनी, मार्च १९८५ ला महाराष्टÑात विधानसभा निवडणुका लागल्या. त्यावेळी वसंतदादांनी राजीव गांधी यांच्याकडे आपले वजन वापरुन मूळ निष्ठावंत काँग्रेसच्या अर्ध्याहून अधिक मंत्री व नेत्यांची तिकीटे कापली होती. इंदिरा गांधी नसल्यामुळे तिकीट कापले गेलेल्यांचे ऐकून घेण्यासही कोणी नव्हते, याचा अचूक राजकीय लाभ वसंतदादांनी उचलला होता.

काँग्रेस आयमधील मूळ निष्ठावंतांनी वसंतदादांच्या विरोधात डॉ. बळीराम हिरे यांना तुम्हीच आमचे नेते म्हणत, त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करणे सुरूकेले होते. ही खेळी हाणून पाडण्यासाठी वसंतदादांनी डॉ. बळीराम हिरे यांचेच तिकीट कापून टाकले. ही खेळी एवढी जबरदस्त होती की वसंतदादा आणि बळीराम हिरे दोघे रात्री उशिरा एकाच विमानाने दिल्लीहून मुंबईत आले. विमानातच त्यांनी हिरे यांना तुमचे तिकीट पक्षश्रेष्ठींनी नाकारले आहे हे सांगून टाकले. शिवाय दिल्लीतही वसंतदादांनी जबरदस्त फिल्डींग लावली होती.

तिकीट नाकारल्याचे कळताच डॉ. हिरे सकाळी दिल्लीत फोनाफोनी करतील आणि ए/बी फॉर्म्स मिळवण्याचा प्रयत्न करतील हे त्यांना माहीत होते. त्यामुळे ज्यांच्याकडे हिरे फोन करणार होते, त्याच महाराष्टÑाच्या प्रभारी असलेल्या नेत्याला दादांनी कळविले की, डॉ. हिरे यांचा फोन आला की तो तुम्ही घेऊ च नका. परिणामी हिरे यांना उमेदवारी अर्जही भरता आला नाही आणि दादांच्या मार्गातील मुख्यमंत्रीपदाचा अडसर असा दूर केला गेला. मात्र हे करताना दादांनी हिरे यांच्या पत्नी इंदिरा हिरे यांना उमेदवारी देऊन उरला सुरला विरोधही कमी करुन टाकला होता. आपण काँग्रेसला बहुमत मिळवून देऊ, अशी ग्वाही त्यांनी राजीव गांधी यांना दिली होती व त्यांना स्वत:लाही तशी ठाम खात्री असल्यामुळेच ते ही खेळी करू शकले.

या निवडणुकीत भाजपने १९८५ च्या काँग्रेसप्रमाणेच खेळी गेली. विजयाची पूर्ण खात्री झाल्याने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रकाश मेहता आदी मंत्री व अनेक आमदारांना दूर सारले. एकनाथ खडसे यांच्या मुलीला तिकीट देऊन त्यांचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला. पक्षासाठी पुरेसे वा पोषक काम न करणाऱ्यांना हा एका प्रकारे श्रेष्ठींनी दिलेला इशाराच आहे! ही तिकिटे कापण्यात दिल्लीचा हात आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Maharashtraमहाराष्ट्र