शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेत चार मतदारसंघांच्या वादावर चर्चा सुरूच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 06:53 IST

भाजप-शिवसेनेत कोण किती व कोणत्या जागा लढणार, याची घोषणा न करताच महायुतीची घोषणा सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केली.

मुंबई : भाजप-शिवसेनेत कोण किती व कोणत्या जागा लढणार, याची घोषणा न करताच महायुतीची घोषणा सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी पत्रकाद्वारे केली. यानंतर, आम्ही प्रचंड यश संपादन करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात व्यक्त केला.चार जागांसाठी भाजप व शिवसेनेने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळेच आज ज्या पत्रकाद्वारे युती झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यात कोण, कोणत्या व किती जागा लढणार हे लवकरच जाहीर केले जाईल, असे म्हटले आहे. म्हणजेच जागावाटपाबाबत दोन पक्षांत एकमत नाही.ज्या जागांवर एकमत आहे, त्यांचे ए/बी फॉर्म देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी सुरू केले. ते आजही सुरू होते. भाजपने ए/बी फॉर्म विभागीय संघटकांकडे सुपुर्द केले असून, त्यांचे वाटप सुरू उद्या होईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून महायुतीचा निर्णय घेतला.उपमुख्यमंत्रिपद सेनेला देण्याचे ठरलेले नाहीउपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याचे ठरलेले नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आदित्य ठाकरे वरळीमधून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करताना, मी ही निवडणूक केवळ आमदार वा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नसून जनसेवेसाठी लढत आहे, असे म्हणाले.शिवसेना नेते संजय राऊत यांंनी आदित्य यांचे कौतुक करताना भारताचे चांद्रयान चंद्रावर उतरू शकले नसले, तरी आमचे हे सूर्ययान (आदित्य) मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर (मुख्यमंत्री कार्यालय), नक्कीच पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. या संदर्भातील प्रश्नावर चंद्रकात पाटील म्हणाले की, महत्त्वाकांक्षा असणे काही गैर नाही. ते जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. प्रत्येक पक्षाला आपला नेता सर्वोच्च पदी जावा, असे वाटतंच असते.युतीत बंडाचे निशाण फडकू लागले : शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप जोरात सुरू आहे. त्यातून आपल्या हातातून जागा जात असल्याचे भाजपच्या एकेका इच्छुकांना स्पष्ट होत आहे. त्यामुळे काही नेत्यांकडून बंडाचे निशाण फडकवणे सुरू झाले आहे. या बंडखोरीच्या भीतीने भाजपच्या यादीला विलंब होत आहे. शिवसेनेतीले विद्यमान आमदार तसेच २०१४ मधील उमेदवारांचा पत्ता कापला गेल्याचे लक्षात आल्याने त्या मतदारसंघातही उद्रेक सुरु झाला आहे.जिथे सहमत, तिथे फॉर्मवाटपवादातील जागांवर चर्चा सुरू ठेवायची आणि एकमत झालेल्या जागांवर आपापल्या उमदेवारांना ए/बी फॉर्मचे वाटप करायचे, असे भाजप-शिवसेनेने ठरविले आहे. युतीची घोषणा दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत होते, पण आज ती घोषणा पत्रकाद्वारे करण्यात आली. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस सायंकाळपर्यंत मुंबईतच नंतर फडणवीस यांनी नागपुरात विजयाचा विश्वास व्यक्त केला. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेना