शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, OpenAI चा मोठा दावा...
2
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
4
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
5
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
6
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
7
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
8
प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी, अश्लिल व्हिडिओ प्रकरणी जर्मनीहून परतल्यावर SIT ने केली होती अटक
9
भारताच्या GDP मध्ये वाढ झाली! चौथ्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के होता; ८% च्या पुढे गेला
10
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
11
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
12
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
13
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
14
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
15
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
16
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
17
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
18
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
19
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 
20
'All Eyes On Rafah'चे स्टेटस ठेवणाऱ्यांना मराठी अभिनेत्याने सुनावलं, म्हणाला..

Vidhan Sabha 2019 : लढत भाजप-शिवसेनेतच, पण संधी आघाडीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 12:01 PM

शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष असाच कायम राहिल्यास, आघाडीसाठी संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला स्थानिक नेत्यांची समजूत काढणे गरजेचे बनले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवारी जाहीर करण्याचा धडका सुरू करण्यात आला आहे. यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात सर्वच पक्षांकडून उशीर करण्यात आला आहे. बंडखोरीवर उपाययोजना म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात दिरंगाई करण्यात आली आहे. मात्र जागा वाटप आणि नाराजांची यादी पाहता, विधानसभा निवडणुकीची सरळ लढत युती असताना देखील भाजप-शिवसेनेतच होण्याची शक्यता आहे. यामुळे दोघांच्या भांडणात आघाडीला यश मिळविण्याची संधी निर्माण होणार आहे.

2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेसह आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील स्वबळावर लढले होते. यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. सुरुवातीला नकार देणारा शिवसेना पक्ष अखेरीस भाजपसोबत सत्तेत सामील झाला. राज्यात सत्तेत असताना सुद्धा शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली. त्यामुळे 2019 मध्ये विधानसभा निवडणूक देखील शिवसेना-भाजप स्वबळावर लढवणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. शिवसेनेचे काही नेते भाजपमध्ये गेले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मेगा भरतीच झाली.

युती होणार नाही, असा विचार करून भाजप आणि शिवसेनेत जाणाऱ्या नेत्यांची आता पंचाईत झाली आहे. युती तुटल असंच या नेत्यांनी गृहीत धरले होते. मात्र ऐनवेळी सगळ उलट झाल्यामुळे सत्ताधारी पक्षातील नाराजांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता ही नाराजी ऐन निवडणुकीत गुप्त पद्धतीने समोर येण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी उघड-उघड विरोध दर्शविण्यात येत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड आणि गंगापूर तालुक्यातील बंडाळी समोर आली आहे. तर पुण्यात देखील हेच होण्याची शक्यता आहे. सिल्लोड मतदार संघ युतीत 25 वर्षांपासून भाजपकडे होता. परंतु, जागा वाटपात हा मतदार संघ अब्दुल सत्तार यांच्यासाठी शिवसेनेला सोडण्यात आला. यामुळे येथील भाजपचे स्थानिक नेते नाराज झाले आहेत. तर काहींनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे सत्तार यांचा मार्ग खडतर झाला आहे.

दुसरीकडे गंगापूर मतदारसंघ शिवसेनेला हवा होता. परंतु, भाजपने या मतदार संघातून प्रशांत बंब यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते नाराज झाले असून विरोधकांसोबत मिळून बंब यांच्याविरुद्ध काम करायचे नियोजन काही नेत्यांनी केली आहे. त्यामुळे बंब यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तसेच पुण्यात भाजपने शहरातील एकही मतदार संघ शिवसेनेला सोडला नाही. यावरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांकडून युती धर्म पाळला जाईल का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशीच स्थिती राज्यातील अनेक मतदारसंघात निर्माण झाली आहे. एकंदरीत शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष निर्माण होत आहे. हा संघर्ष असाच कायम राहिल्यास, आघाडीसाठी संधी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेला स्थानिक नेत्यांची समजूत काढणे गरजेचे बनले आहे.