शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माझ्याविरोधात अविश्वास असेल तर...; नीलम गोऱ्हेंनी विरोधकांना सुनावले, नेमकं काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 12:43 IST

Maharashtra Monsoon Session: विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या अधिवेशनात पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे आमदार समोरासमोर आले. काही आमदार सत्ताधारी बाकांवर तर काही विरोधी बाकांवर बसले. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेनंतर विधान परिषदेतही राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले. त्याचसोबत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अलीकडेच उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यामुळे विधान परिषदेच्या सभागृहात पहिल्याच दिवशी सत्ताधारी-विरोधक यांच्यात जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विधान परिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. परंतु नव्या मंत्र्यांची ओळख करून दिल्याशिवाय कामकाज सुरू होणार नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात सभापतीपदावरून आक्षेप घेतला. जयंत पाटील म्हणाले की, या सभागृहातील अधिकार व्यक्ती आहे जे सभागृह चालवतात विधान परिषदेच्या सभापतीपदावर बसलेल्या व्यक्तीचा कुठलाही पक्ष नसतो. त्यांचे पक्ष सदस्यत्व जाते. माझ्याकडे संसदेचे सगळे नियम आहे. त्यावर सत्ताधारी बाकांवर कोर्टात जा असं म्हटल्यावर तुमच्यासाठी कोर्ट सोप्पे आहे असं प्रत्युत्तर जयंत पाटलांनी दिले.

जयंत पाटील बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभे राहून त्यावर पाँईट ऑफ ऑर्डर उपस्थित केला. फडणवीस म्हणाले की, असं कधीही कुठल्याही वेळी सभापतींवर आक्षेप घेता येत नाही. त्याचे काही नियम आहेत. जर नियमांत बसत असेल तर आक्षेप घेता येतो. हा आक्षेप कुठल्याही नियमांत बसत नाही. शोकप्रस्ताव असताना नियमाबाह्य कामकाज चालवता येणार नाही. विनानोटीस असा आक्षेप घेता येणार नाही हा माझा पाँईट ऑफ ऑर्डर आहे. अशाप्रकारे विरोधी पक्षाला सभागृह वेठीस धरता येणार नाही असं त्यांनी म्हटलं.

या गोंधळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी त्यांची भूमिका मांडत विरोधकांना खडेबोल सुनावले. मी लोकशाहीवादी व्यक्ती आहे. गोंगाट करतायेत जे काही करायचे त्याआधी नियमांवर चर्चा करू. आजचे कामकाज होऊद्या. ज्यावेळी शोक प्रस्ताव असतो त्यावेळी दुसरा कुठलाही विषय घेता येत नाही. एकदा चर्चा सुरू केली तर दोन्ही बाजूच्या नेत्यांना बोलायला द्यावे लागेल. गटनेत्यांच्या बैठकीला उपस्थित असता तर तुम्हाला निर्धारित वेळ ठरवून दिला असता. माझ्याविरोधात अविश्वास असेल तर मी माझ्या अधिकारात तुम्हाला तसा ठराव सभागृहात मांडण्याची अनुमती देऊ शकते. परंतु गटनेत्यांच्या बैठकीत तुम्ही आला नाहीत. चर्चा केली नाही. उद्या याला वेळ देण्याबाबत चर्चा करू. आता मी काही ऐकू शकत नाही. मी चर्चेला वेळ देते पण अशाप्रकारे सभागृह चालवू शकत नाही. हे सभागृह नियमाने चालेल असं त्यांनी विरोधकांना ऐकवले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNeelam gorheनीलम गो-हेVidhan Parishadविधान परिषद