शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
3
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
4
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
5
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
6
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
7
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
8
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
9
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
10
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
11
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
12
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
13
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
14
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
15
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
16
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
17
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
18
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
19
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
20
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 16:06 IST

राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी होणार आहे. आमच्या आमदारांवर दबाव आणला असं कुणी फोन करून सांगितले नाही अशी माहिती अजितदादांनी दिली.

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता अवघे ४८ तास उरले आहेत. या निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपाचे ५, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ उमेदवार उभे आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपाला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे अपक्षांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहे. 

या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मत बाद होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. राज्यसभेत १ मत बाद झाले होते. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मते कुणाला द्यायची ते ठरवलं जाईल. महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केला हे खरं आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ते झाले. काही अपक्षांनी उद्धव ठाकरे बोलतील त्यांना मतदान करू असं स्पष्ट सांगितले असं अजितदादा म्हणाले. 

तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी होणार आहे. आमच्या आमदारांवर दबाव आणला असं कुणी फोन करून सांगितले नाही. आमदार निवडून देताना प्रत्येकाकडे आपापला कोटा आहे. राज्यसभेत तिन्ही पक्षाकडे काही मते शिल्लक होती. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु आता शिवसेनेला २ निवडून आणायचे आहेत. संख्याबळानुसार ते निवडून येतील असं चित्र आहे. आम्हाला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही संख्या कमी पडतेय. त्यामुळे अपक्षांना सोबत घेऊन आकडा गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे अशीही माहिती अजित पवारांनी दिली. 

दरम्यान, लोकशाहीत आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही. अपक्षांना मान सन्मान दिला पाहिजे. अपक्षांची मते राष्ट्रवादीला कशी मिळतील यावर आमचे लक्ष आहे. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना सर्व पक्षांचे नेते जाऊन भेटले आहे. स्वातंत्र्य विचाराचे जे आहेत त्यांना भेटून मत मिळवणे हे उमेदवाराचे आणि पक्षाचे काम असते. क्षितीज ठाकूर परदेशात आहेत ते येतील का त्यावर शंका आहे. त्यामुळे २८८ पैकी १ मयत, २ जणांना परवानगी नाही. क्षितीज नाही आला तर २८४ मते आहेत. तर उमेदवार निवडून येण्यासाठी २६ मतांचा कोटा लागेल. पक्षाचे मतदार पक्षाच्या उमेदवारांना मते देतील असं अजित पवारांनी सांगितले. 

राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणं हिताचं नाहीअग्निपथ योजनेमुळे देशभरात विविध ठिकाणी हिंसक आंदोलन पेटलं आहे. परंतु राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणे हे कुणाच्या हिताचं नाही. देशाचं नुकसान होते. याची नोंद तरूणांनी घ्यावी. तरूणांची भावना समजू शकतो. सध्या नोकरीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. अग्निपथ योजनेबाबत काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या पाहिजेत. यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे असं अजितदादांनी म्हटलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक