शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Vidhan Parishad Election: अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती; अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 16:06 IST

राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी होणार आहे. आमच्या आमदारांवर दबाव आणला असं कुणी फोन करून सांगितले नाही अशी माहिती अजितदादांनी दिली.

मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता अवघे ४८ तास उरले आहेत. या निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपाचे ५, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ उमेदवार उभे आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपाला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे. त्यामुळे अपक्षांना आपल्याबाजूने वळवण्यासाठी सर्वच पक्ष तयारी करत आहे. 

या निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मत बाद होणार नाही यासाठी काळजी घेतली जाईल. राज्यसभेत १ मत बाद झाले होते. पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची मते कुणाला द्यायची ते ठरवलं जाईल. महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. अपक्षांना काही नेत्यांनी फोन केला हे खरं आहे. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ते झाले. काही अपक्षांनी उद्धव ठाकरे बोलतील त्यांना मतदान करू असं स्पष्ट सांगितले असं अजितदादा म्हणाले. 

तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची संध्याकाळी होणार आहे. आमच्या आमदारांवर दबाव आणला असं कुणी फोन करून सांगितले नाही. आमदार निवडून देताना प्रत्येकाकडे आपापला कोटा आहे. राज्यसभेत तिन्ही पक्षाकडे काही मते शिल्लक होती. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेणे गरजेचे होते. परंतु आता शिवसेनेला २ निवडून आणायचे आहेत. संख्याबळानुसार ते निवडून येतील असं चित्र आहे. आम्हाला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही संख्या कमी पडतेय. त्यामुळे अपक्षांना सोबत घेऊन आकडा गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे अशीही माहिती अजित पवारांनी दिली. 

दरम्यान, लोकशाहीत आरोप प्रत्यारोप करून मार्ग निघत नाही. अपक्षांना मान सन्मान दिला पाहिजे. अपक्षांची मते राष्ट्रवादीला कशी मिळतील यावर आमचे लक्ष आहे. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना सर्व पक्षांचे नेते जाऊन भेटले आहे. स्वातंत्र्य विचाराचे जे आहेत त्यांना भेटून मत मिळवणे हे उमेदवाराचे आणि पक्षाचे काम असते. क्षितीज ठाकूर परदेशात आहेत ते येतील का त्यावर शंका आहे. त्यामुळे २८८ पैकी १ मयत, २ जणांना परवानगी नाही. क्षितीज नाही आला तर २८४ मते आहेत. तर उमेदवार निवडून येण्यासाठी २६ मतांचा कोटा लागेल. पक्षाचे मतदार पक्षाच्या उमेदवारांना मते देतील असं अजित पवारांनी सांगितले. 

राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणं हिताचं नाहीअग्निपथ योजनेमुळे देशभरात विविध ठिकाणी हिंसक आंदोलन पेटलं आहे. परंतु राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करणे हे कुणाच्या हिताचं नाही. देशाचं नुकसान होते. याची नोंद तरूणांनी घ्यावी. तरूणांची भावना समजू शकतो. सध्या नोकरीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. अग्निपथ योजनेबाबत काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या पाहिजेत. यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे असं अजितदादांनी म्हटलं. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक