शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

Vidhan Parishad Election: एकनाथ शिंदे, अजित पवारांचं शेवटच्या क्षणी मतदान; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:45 IST

सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले.

मुंबई - विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक आजारी असतानाही मतदानासाठी विधान भवनात दाखल झाले. आता या निवडणुकीच्या मतदानाला काही मिनिटं शिल्लक राहिलेले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, एकनाथ शिंदे मतदान शेवटच्या क्षणी करत आहेत. 

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत नवाब मलिक, अनिल देशमुख यांना मतदानाची परवानगी हायकोर्टाने नाकारली. तर शिवसेनेचे अंधेरी पुर्वचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे विधान परिषदेसाठी २८५ आमदार मतदान करू शकतात. सकाळी ९ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत मतदानाची मुदत आहे. या निवडणुकीत कुठलाही दगाफटका बसू नये यासाठी प्रत्येक पक्षाने खबरदारी घेतली आहे. 

सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरुवातीला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मतदान देण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपानेही टप्प्याटप्प्याने आमदारांना मतदान करण्यास सांगितले. दुपारी १२ च्या सुमारास शिवसेनेच्या आमदारांनी मतदानाल सुरूवात केली. आतापर्यंत २७९ आमदारांनी मतदान केले आहे. यानंतर आता महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील मतदानाला गेले आहे. 

नवाब मलिक, अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टानेही परवानगी नाकारली हायकोर्टाने मलिक-देशमुख यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी नाकारली. त्यानंतर दोघांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. दुपारी २ वाजता ही सुनावणी सुरू झाली. तेव्हा जर मतदानाची परवानगी दिली तर मतदान करू शकता का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांच्या वकिलांना विचारणा केली. मात्र हायकोर्टाने उशीरा निकाल पत्र दिल्यामुळे सुप्रीम कोर्टात येण्यास उशीरा झाला असं सांगण्यात आले. परंतु या प्रकरणावर तातडीने निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार देत मतदानाला परवानगी देण्याची याचिका फेटाळून लावली. 

मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल - रवी राणा महाविकास आघाडीची बिघाडी होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात मतांचे परिवर्तन भाजपाकडे झाले आहे. अपक्षांची मदत आणि काही मविआ आमदारांची साथ यामुळे भाजपाचा पाचवा उमेदवार निवडून येईल. या निकालाचा परिणाम पाहून मुख्यमंत्र्यांना धक्का बसेल असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे