शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Vidhan Parishad Election: "अप्पा, मला शिव्या दिल्या म्हणून यावं लागलं"; BJP नेते हितेंद्र ठाकूरांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:34 IST

राज्यसभा निकालात बहुजन विकास आघाडीची ३ मते निर्णायक ठरली. त्यानंतर आता पुन्हा विधान परिषदेत ही मते मिळावी यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीनेही प्रयत्न सुरू केले आहेत

विरार - राज्यसभेच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. येत्या २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपाकडून ५ आणि महाविकास आघाडीकडून ६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी उमेदवार आणि पक्षाच्या नेत्यांची धडपड सुरू आहे. यात अपक्ष, घटक पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

राज्यसभा निकालात बहुजन विकास आघाडीची ३ मते निर्णायक ठरली. त्यानंतर आता पुन्हा विधान परिषदेत ही मते मिळावी यासाठी भाजपासोबत राष्ट्रवादीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. २ दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यानंतर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन आणि प्रविण दरेकर हे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला विरारला पोहचले. गिरीश महाजन आणि प्रविण दरेकर यांनी चर्चगेटहून विरार लोकल पकडून ठाकूरांचे घर गाठले. 

यावेळी प्रविण दरेकर, महाजन यांनी वाहनातून उतरताना त्यांची वाट पाहणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत दरेकरांचा प्रेमळ संवाद झाल्याचं पाहायला मिळालं. दरेकर गाडीतून उतरले अन् म्हणाले, "अप्पा, मी ऐकलं तुम्ही मला शिव्या दिल्या म्हणून मला यायला लागलं. प्रसाद बोलला, अप्पा बोलले प्रविण लय मोठा झाला का विरोधी पक्षनेता बनला तर." त्यावर प्रसादलाच मी घातल्या असं सांगत दरेकर, महाजन आणि हितेंद्र ठाकूर हे आतमध्ये गेले. 

"२६ आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल"दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीत ११ पैकी १० जण निवडून येणार, एकाचा पराभव होणार हा चमत्कार घडणारच आहे. चमत्कार कुणाच्या बाजूने घडेल हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असं विधान केले आहे.  

शिवसेनेच्या समर्थक आमदारांना काँग्रेस-एनसीपी नेत्यांनी फोन केल्याच्या वादावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार म्हणाले की, मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोललो. तुमचे ५६ आणि ४-५ जण मिळून ६० होतात. ३० -३० मते पडली तर इतर अपक्षांना सोबत घेण्याबाबत मी फोन केले. महाविकास आघाडी समर्थक अपक्षांना फोन केले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांनीही सांगितले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी आपापल्या परीने तयारी करावी असं सांगितले. मतदानादिवशी मतांचा कोटा कसा असावा हे सांगतो असंही त्यांनी सांगितले. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते घेतल्यानंतर तिसरा आणि चौथ्यासाठी एकत्र बसून ठरवू असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकpravin darekarप्रवीण दरेकरGirish Mahajanगिरीश महाजनHitendra Thakurहितेंद्र ठाकूर