शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव का झाला? रणनीती कुठे चुकली? शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 14:14 IST

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव नेमका का झाला, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे. 

गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने मुसंडी मारत ९ जागांवर विजय मिळवला होता. तर विरोधा पक्षातील महाविकास आघाडीला केवळ २ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार आणि शेकाप नेते जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. जयंत पाटील यांचा झालेला पराभव हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव नेमका का झाला याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे. 

आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडमधील घटक पक्षांमध्ये एकत्रित निर्णय झाला नव्हता. मलाही इंट्रेस नव्हता. आमच्या पक्षाकडे सगळी मिळून १२ मतं होती. शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे, असं आम्हाला वाटलं. त्याला एक कारण होतं. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. ती आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली. मात्र महाविकास आघाडीमधील इतर लहान पक्षांनीही जागांची मागणी केली होती. तेव्हा आपण लोकसभा निवडणुकीत या पक्षांना जागा देऊ शकत नाही, मात्र विधान परिषद निवडणूक किंवा विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षांना सामावून घेऊ, असं मी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सांगितलं. ते सगळ्यांनी मान्य केलं. डाव्या पक्षांनीही मान्य केलं. मदग आम्ही तिघेही एकत्र लढलो आणि आम्हाला यशही चांगलं मिळालं , असं शरद पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, संधी आली तर डाव्या पक्षांचा विचार करायचा, हे माझ्या मनात होतं. त्यानुसार विधान परिषद निवडणुकीत मी आमच्या पक्षाकडे असलेली १२ मतं शेकापला देण्याचा निर्णय घेतला. तसेच याबाबत मित्रपक्षांनाही कळवलं. त्याचवेळी काँग्रेसकडे मतं अधिक होती. त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साहजिकच होतं. शिवसेनेकडे मतं होती पण उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी नव्हती. मात्र त्यांनी आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणुकीसाठी आखलेल्या रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं. काँग्रेसने आपल्याकडील पहिल्या प्राधान्याची मतं इतर कुणालाही देऊ नये. तर दुसऱ्या प्राधान्याची अर्धी मतं शिवसेना आणि अर्धी मतं शेकापला द्यावीत. तसेच शिवसेनेनं आपली दुसऱ्या प्राधान्याची मतं शेकापला द्यावीत, असं माझं मत होतं. असं झालं असतं तर तिन्ही उमेदवार विजयी झालं असतं. मात्र हे गणित सगळ्यांनाच मान्य होईल, असं नव्हतं. ते मान्य झालं नाही. त्यामुळे अखेरीस जयंत पाटील यांचा पराभव झाला, असे शरद पवार यांनी सांगितले. 

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त रणनीती कशी असावी, यासंबंधीची मतभिन्नता होती, असं शरद पवार यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत अकराव्या जागेसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यात दुसऱ्या प्राधान्याच्या मतांमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली होती. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती