शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव का झाला? रणनीती कुठे चुकली? शरद पवार यांचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 14:14 IST

Vidhan Parishad Election 2024: विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव नेमका का झाला, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे. 

गेल्या आठवड्यात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीने मुसंडी मारत ९ जागांवर विजय मिळवला होता. तर विरोधा पक्षातील महाविकास आघाडीला केवळ २ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार आणि शेकाप नेते जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. जयंत पाटील यांचा झालेला पराभव हा महाविकास आघाडीसाठी धक्का मानला जात आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव नेमका का झाला याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे. 

आज पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडमधील घटक पक्षांमध्ये एकत्रित निर्णय झाला नव्हता. मलाही इंट्रेस नव्हता. आमच्या पक्षाकडे सगळी मिळून १२ मतं होती. शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे, असं आम्हाला वाटलं. त्याला एक कारण होतं. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. ती आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढली. मात्र महाविकास आघाडीमधील इतर लहान पक्षांनीही जागांची मागणी केली होती. तेव्हा आपण लोकसभा निवडणुकीत या पक्षांना जागा देऊ शकत नाही, मात्र विधान परिषद निवडणूक किंवा विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षांना सामावून घेऊ, असं मी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सांगितलं. ते सगळ्यांनी मान्य केलं. डाव्या पक्षांनीही मान्य केलं. मदग आम्ही तिघेही एकत्र लढलो आणि आम्हाला यशही चांगलं मिळालं , असं शरद पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, संधी आली तर डाव्या पक्षांचा विचार करायचा, हे माझ्या मनात होतं. त्यानुसार विधान परिषद निवडणुकीत मी आमच्या पक्षाकडे असलेली १२ मतं शेकापला देण्याचा निर्णय घेतला. तसेच याबाबत मित्रपक्षांनाही कळवलं. त्याचवेळी काँग्रेसकडे मतं अधिक होती. त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साहजिकच होतं. शिवसेनेकडे मतं होती पण उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी नव्हती. मात्र त्यांनी आपला उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निवडणुकीसाठी आखलेल्या रणनीतीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं. काँग्रेसने आपल्याकडील पहिल्या प्राधान्याची मतं इतर कुणालाही देऊ नये. तर दुसऱ्या प्राधान्याची अर्धी मतं शिवसेना आणि अर्धी मतं शेकापला द्यावीत. तसेच शिवसेनेनं आपली दुसऱ्या प्राधान्याची मतं शेकापला द्यावीत, असं माझं मत होतं. असं झालं असतं तर तिन्ही उमेदवार विजयी झालं असतं. मात्र हे गणित सगळ्यांनाच मान्य होईल, असं नव्हतं. ते मान्य झालं नाही. त्यामुळे अखेरीस जयंत पाटील यांचा पराभव झाला, असे शरद पवार यांनी सांगितले. 

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त रणनीती कशी असावी, यासंबंधीची मतभिन्नता होती, असं शरद पवार यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत अकराव्या जागेसाठी ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यात दुसऱ्या प्राधान्याच्या मतांमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी बाजी मारली होती. 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती