शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मजुरांबाबत विधानभवनच्या पुढाकाराचा पुरता फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 01:40 IST

साधारणपणे ३० एप्रिल रोजी विधानमंडळा सचिवालयाने सर्व आमदारांना असे कळविले की त्यांच्या मतदारसंघातील जे लोक बाहेरगावी अडकलेले आहेत त्यांना मूळ गावी आणायचे असल्यास त्यांची नावे व इतर माहिती विधान मंडळास कळवावी.

मुंबई : मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाने घेतलेल्या पुढाकाराचा फज्जा उडाला आहे.या पुढाकारातून एकाही मजुरांचे स्थलांतर होऊ शकले नाही. प्रशासकीय यंत्रणेने योग्य दखल घेत सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती असे मत आमदारांनी व्यक्त केले.साधारणपणे ३० एप्रिल रोजी विधानमंडळा सचिवालयाने सर्व आमदारांना असे कळविले की त्यांच्या मतदारसंघातील जे लोक बाहेरगावी अडकलेले आहेत त्यांना मूळ गावी आणायचे असल्यास त्यांची नावे व इतर माहिती विधान मंडळास कळवावी. राज्यात तसेच राज्याबाहेरील अडकलेल्या व्यक्तींचीही माहिती मागवण्यात आली होती. त्यासाठी विधान भवनात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला.कारंजा, जिल्हा वाशिमचे आमदार राजेंद्र पाटणी आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याबाबतचा कटू अनुभव लोकमतला सांगितला.आम्ही विधानभवनच्या नियंत्रण कक्षाकडे शेकडो नावे पत्ता, मोबाईल नंबरसह पाठवली. काही दिवसांनंतर विधानमंडळ सचिवा लया कडे विचारणा केली असता ती नावे मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागात पाठवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र विधानमंडळाने उभारलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून आजवर एकाही व्यक्तीचे स्थलांतर होऊ शकलेले नाही.विधानमंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अडकलेल्या व्यक्तींना मूळगावी पोहोचवण्यासाठीची यंत्रणा आमच्याकडे नाही.अर्थातच आम्ही मदत व पुनर्वसन विभागाला कळवले.सूत्रांनी सांगितले की मदत व पुनर्वसन विभागातून या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयांकडून त्या तहसीलदारांना पाठवण्यात आल्या आणि आता उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हे आमदारांना फोन करून स्थलांतराचे काय करायचे अशी विचारणा करीत आहेत. आमदारांनी केलेली विचारणा फिरून त्यांनाच करण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या