शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांबाबत विधानभवनच्या पुढाकाराचा पुरता फज्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 01:40 IST

साधारणपणे ३० एप्रिल रोजी विधानमंडळा सचिवालयाने सर्व आमदारांना असे कळविले की त्यांच्या मतदारसंघातील जे लोक बाहेरगावी अडकलेले आहेत त्यांना मूळ गावी आणायचे असल्यास त्यांची नावे व इतर माहिती विधान मंडळास कळवावी.

मुंबई : मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाने घेतलेल्या पुढाकाराचा फज्जा उडाला आहे.या पुढाकारातून एकाही मजुरांचे स्थलांतर होऊ शकले नाही. प्रशासकीय यंत्रणेने योग्य दखल घेत सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती असे मत आमदारांनी व्यक्त केले.साधारणपणे ३० एप्रिल रोजी विधानमंडळा सचिवालयाने सर्व आमदारांना असे कळविले की त्यांच्या मतदारसंघातील जे लोक बाहेरगावी अडकलेले आहेत त्यांना मूळ गावी आणायचे असल्यास त्यांची नावे व इतर माहिती विधान मंडळास कळवावी. राज्यात तसेच राज्याबाहेरील अडकलेल्या व्यक्तींचीही माहिती मागवण्यात आली होती. त्यासाठी विधान भवनात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला.कारंजा, जिल्हा वाशिमचे आमदार राजेंद्र पाटणी आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी याबाबतचा कटू अनुभव लोकमतला सांगितला.आम्ही विधानभवनच्या नियंत्रण कक्षाकडे शेकडो नावे पत्ता, मोबाईल नंबरसह पाठवली. काही दिवसांनंतर विधानमंडळ सचिवा लया कडे विचारणा केली असता ती नावे मंत्रालयातील मदत व पुनर्वसन विभागात पाठवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र विधानमंडळाने उभारलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून आजवर एकाही व्यक्तीचे स्थलांतर होऊ शकलेले नाही.विधानमंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अडकलेल्या व्यक्तींना मूळगावी पोहोचवण्यासाठीची यंत्रणा आमच्याकडे नाही.अर्थातच आम्ही मदत व पुनर्वसन विभागाला कळवले.सूत्रांनी सांगितले की मदत व पुनर्वसन विभागातून या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयांकडून त्या तहसीलदारांना पाठवण्यात आल्या आणि आता उपजिल्हाधिकारी, तहसीलदार हे आमदारांना फोन करून स्थलांतराचे काय करायचे अशी विचारणा करीत आहेत. आमदारांनी केलेली विचारणा फिरून त्यांनाच करण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या