शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:37 IST

आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्‍यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्‍यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया अशी तंबी अजित पवारांनी दिली.

नागपूर - बऱ्याचदा मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात. तिथे पक्षातील जिल्हाध्यक्षाला विचारत नाहीत, त्यांच्याकडे पाहतही नाहीत. त्यांच्याशी बोलत नाही. तो आपल्या परिवारातील घटक आहे त्यामुळे असं वागू नका. आपल्याला तसं करून चालणार नाही. माझ्यासह सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील मंत्र्‍यांचे कान टोचले आहेत. 

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाने वेळेला महत्त्व दिले पाहिजे. वेळेत कार्यक्रमाला आले पाहिजे. पुढच्या वेळी ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू व्हायला हवा. कार्यक्रमस्थळी दरवाजा बंद करावा का असा विचार सुरू आहे. विमानासारखे टेक ऑफ व्हायच्या दरवाजा बंद करून टाकतात. कुणाला किती गांभीर्य आहे हे एकदा कळू द्या. एक दिवस तुम्हाला वेळेत या सांगितले तरी काहींना त्रास होतो. सत्ता आणि पदांसाठी आपण पाऊल उचललं नव्हते तर महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज आहे म्हणून आपण हा मार्ग स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्‍यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्‍यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया, ते दुसऱ्या कुणाला तरी देऊया. नुसते शिबिर घेऊन चालणार नाही. या शिबिरात जे निर्णय होतील त्यांची अंमलबजावणी करणार आहे. संघटना संघटनेचे काम करेल. काही गोष्टीत बदल करायच्या आहेत. पूर्वीच्या राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणात जमीन अस्मानचा फरक आहे. सोशल मिडिया सक्रीय आहे. एखाद्या बाबींत मागचे पुढचे बाजूला करून काही क्लिप दाखवून ट्रोल केले जाते. काही कामे करत नाहीत त्यांना प्रसिद्धी मिळते. काही कामे करतात परंतु त्यांना प्रसिद्धी मिळत नाही असंही अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्यात जावे लागेल. फक्त १ मे, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी तेव्हाच जायचं असं नाही. त्या दिवशी जावेच लागेल त्याव्यतिरिक्त जिल्ह्यात काम करावे लागेल. तिथले जिल्हाधिकारी, प्रमुख आमदार, खासदार यांना सोबत घेऊन आपल्याला लोकांमध्ये फिरावे लागेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस