शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:37 IST

आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्‍यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्‍यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया अशी तंबी अजित पवारांनी दिली.

नागपूर - बऱ्याचदा मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात. तिथे पक्षातील जिल्हाध्यक्षाला विचारत नाहीत, त्यांच्याकडे पाहतही नाहीत. त्यांच्याशी बोलत नाही. तो आपल्या परिवारातील घटक आहे त्यामुळे असं वागू नका. आपल्याला तसं करून चालणार नाही. माझ्यासह सगळ्यांना ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतील त्या दुरुस्त कराव्या लागतील, नाहीतर खुर्ची खाली करावी लागेल अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील मंत्र्‍यांचे कान टोचले आहेत. 

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिंतन शिबिर पार पडले. या शिबिरात अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाने वेळेला महत्त्व दिले पाहिजे. वेळेत कार्यक्रमाला आले पाहिजे. पुढच्या वेळी ठरलेल्या वेळेत कार्यक्रम सुरू व्हायला हवा. कार्यक्रमस्थळी दरवाजा बंद करावा का असा विचार सुरू आहे. विमानासारखे टेक ऑफ व्हायच्या दरवाजा बंद करून टाकतात. कुणाला किती गांभीर्य आहे हे एकदा कळू द्या. एक दिवस तुम्हाला वेळेत या सांगितले तरी काहींना त्रास होतो. सत्ता आणि पदांसाठी आपण पाऊल उचललं नव्हते तर महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयांची गरज आहे म्हणून आपण हा मार्ग स्वीकारला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आठवड्याचे ३ दिवस मुंबईत आणि बाकीचे दिवस मतदारसंघात असतात. मंत्र्‍यांनी पक्षासाठी वेळ द्यायला हवा. जर पक्षापेक्षा काही मंत्र्‍यांना इतर कामे जास्त असतील तर ते पद आपण मोकळे करूया, ते दुसऱ्या कुणाला तरी देऊया. नुसते शिबिर घेऊन चालणार नाही. या शिबिरात जे निर्णय होतील त्यांची अंमलबजावणी करणार आहे. संघटना संघटनेचे काम करेल. काही गोष्टीत बदल करायच्या आहेत. पूर्वीच्या राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणात जमीन अस्मानचा फरक आहे. सोशल मिडिया सक्रीय आहे. एखाद्या बाबींत मागचे पुढचे बाजूला करून काही क्लिप दाखवून ट्रोल केले जाते. काही कामे करत नाहीत त्यांना प्रसिद्धी मिळते. काही कामे करतात परंतु त्यांना प्रसिद्धी मिळत नाही असंही अजित पवारांनी सांगितले. 

दरम्यान, ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळाले आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्यात जावे लागेल. फक्त १ मे, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी तेव्हाच जायचं असं नाही. त्या दिवशी जावेच लागेल त्याव्यतिरिक्त जिल्ह्यात काम करावे लागेल. तिथले जिल्हाधिकारी, प्रमुख आमदार, खासदार यांना सोबत घेऊन आपल्याला लोकांमध्ये फिरावे लागेल असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस