शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- पत्रपेट्यांना लागले ग्रहण !

By admin | Updated: October 9, 2016 20:54 IST

पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा.

राम देशपांडे/ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 9 - पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा. त्या पत्रांतील अक्षरांमध्ये भावनेचा ओलावा, मायेची गुंफण असायची. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ई-मेल, एसएमएस, फेसबुक, व्हॉट्स अँपद्वारे क्षणात संदेश पोहोचविता येत आहेत. त्यामुळे एकेकाळी संपर्काचे माध्यम म्हणून मदतीला येणार्‍या पोस्टाच्या पत्रपेट्या जीर्णावस्थेकडे वाटचाल करीत असून, कालबाह्य होत असल्याचे दिसत आहे. डाक विभागाने शहरात उभारलेल्या पत्रपेट्यांपैकी, अनेक पत्रपेट्या काळाच्या ओघात जीर्ण होऊन नष्ट झाल्या आहेत. रंगरंगोटी करून अनेक पत्रपेट्यांचे रूप पालटले असले, तरी त्यांचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे. खदान परिसरातील शासकीय गोदामासमोरील पत्रपेटीचा लाल रंग शाबूत आहे; मात्र परिसरातील काही टपोरी पोरांनी तिचे कुलूप तोडले असून, त्यात दगड, मेनकापडाच्या पिशव्या व कचरा जमा झाला आहे. रात्रीच्या वेळी या पत्रपेटीच्या साक्षीने मद्याचे घोटदेखील रिचविले जात असल्याचे अवशेष तिच्या अवतीभोवती दिसून येतात. विश्‍वासार्हता लोप पावल्यामुळे पत्रपेटीचा वापर करण्यास नागरिक टाळाटाळ करतात. शहरातील अनेक पत्रपेट्यांची विश्‍वासार्हता अशा पद्धतीने लोप पावली असल्याने, अनेक गरजू नागरिक थेट डाकघर गाठत असल्याचे दिसून येते. एक काळ होता, जेव्हा दूरदर्शन आणि काही खासगी दूरचित्रवाहिन्यांवर काही नावाजलेल्या कार्यक्रमांनी टपाल खात्याला सुवर्णकाळ दाखविला. धडाक्याने होत असलेल्या पोस्ट कार्डांच्या विक्रीमुळे टपाल खात्याला चक्क निळय़ा रंगाची स्पर्धात्मक पोस्ट कार्डांची निर्मिती करावी लागली होती; मात्र आता प्रत्येकाच्या हातात स्मार्ट मोबाइलचे तंत्रज्ञान आले असल्याने, चॅटिंग, मॅसेजिंग, ई-मेल व सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे माहितीची देवाण-घेवाण त्वरित होऊ लागली आहे. त्यामुळे संदेशवहनाच्या प्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पत्रपेट्यांना ग्रहण लागले असून, डाक विभागाचे अधिकारीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

--------------------------शहरातील पत्रपेट्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दोन हजारच्या दशकात पत्रपेट्यांमधून डाक जमा करण्यासाठी मोठे पोते बाळगावे लागायचे. बोटावर मोजण्याइतक्या पत्रपेट्याच सुस्थितीत असल्याने आता डाक आणण्यासाठी एक लहानशी पिशवी पुरेशी ठरते. - एस. एम. टिपरकारपोस्टमन, अकोला.