शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'या' मुस्लीम मुलीचं शिवरायांवरील भाषण ऐकून अंगावर शहारा येईल; सोशल मीडियात कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 15:57 IST

शिवजयंती: अवघ्या ५ मिनिटाच्या भाषणात या मुलीने शिवरायांच्या काळात स्त्रीचा कसा सन्मान करण्यात येत होता यावर भाष्य केलं आहे.

ठळक मुद्देमहाराजांच्या दरबारात कधीच स्त्री नाचली नाहीपरस्त्रीला मातेचा दर्जा महाराजांनी दिलास्वराज्यात स्त्रियांचा योग्य सन्मान राखला गेला

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच शिवजयंतीच्या जल्लोषात सहभागी झाले होते. शिवरायांचे पोवाडे, व्याख्यान असे विविध कार्यक्रम घेतले जात होते. त्यातच शिवजयंतीनिमित्त रायगडमधील मुरुड येथील एका मुस्लीम शाळकरी मुलीचं भाषण सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

अवघ्या ५ मिनिटाच्या भाषणात या मुलीने शिवरायांच्या काळात स्त्रीचा कसा सन्मान करण्यात येत होता यावर भाष्य केलं आहे. तिच्या या व्हिडीओचं शिवभक्तांकडून कौतुक केलं जात आहे. या व्हिडिओत ती म्हणते की, स्थळ लालमहल, वेळ-मध्यरात्रीची, निर्धास्तपणे झोपलेला शाहिस्तेखान, अचानक आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वादळापासून वाचवण्यासाठी शाहिस्तेखान पळू लागला, मात्र याच झटापटीत शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली. काही वेळाने शिवरायांचे वादळ शांत झालं. त्यानंतर घाबरलेल्या स्थितीत धावत धावत शाहिस्तेखानाची बहिण येते, भाईजान, माझ्या मुलीला शिवाजीने पळवून नेलं असं सांगते त्यावेळी शाहिस्तेखान म्हणतो, शिवाजी कोणाचं मुंडकं कापू शकतो, हात-पाय कापू शकतो पण कोणत्याही मुली-महिलांना पळवून नेणार नाही. शत्रूंनीही विश्वास ठेवावा असा आपल्या शिवरायांचे स्त्रीविषयक धोरक होते असं ती म्हणते. 

शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी केलेले नियम, कठोर पाऊल हे स्त्रीमुक्तीसाठी केलेली क्रांती होती. हजारो वर्षापासून प्रथा-परंपरेला धक्का लावण्याचं हिंमत कोणी करु  शकलं नाही, पण ते आमच्या राजांनी केलं. तलवार सगळ्यांच्या हातात होती, ताकद सर्वांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त शिवबांच्या मनात होती अशा शब्दात तिने महाराजांनी स्त्रियांबद्दल उचलेलं धोरण सांगितले.  

स्वराज्यात स्त्रियांचा योग्य सन्मान राखला गेला, कोणत्याही महिलेवर अन्याय-अत्याचार करणाऱ्यांची स्वराज्यात कधीच गय केली नाही. ज्याने कोणी असं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथल्या तिथे कठोर शिक्षा केली जात होती. मात्र आताच्या काळात १७ व्या वर्षी बलात्कार झालेल्या मुलीला वयाच्या ७० व्या वर्षीपर्यंत न्यायाची वाट पाहावी लागते, मात्र रांझेपाटलाने एका शेतकऱ्यांच्या मुलीवर अत्याचार केला त्याचे हातपाय छाटण्याची शिक्षा महाराजांनी त्वरीत दिली. त्यामुळे शिवरायांची गरज या महाराष्ट्राला आहे असं या मुलीने सांगितले. 

तसेच शिवरायांच्या पहिल्या गुरु मातोश्री जिजाऊंनी न्याय,बुद्धी, महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली. मातोश्रीने सांगितले आपल्याला स्त्री वाचवायची आहे नाचवायची नाही, त्यामुळे महाराजांच्या दरबारात कधीच स्त्री नाचली नाही, परस्त्रीला मातेचा दर्जा महाराजांनी दिला, शत्रूंच्या स्त्रीलाही सन्मान करण्याचा राजा आपला होता. ज्या काळात युद्ध झाल्यानंतर शत्रूंच्या स्त्रियांवर अत्याचार होत असे, एक भेटवस्तू म्हणून स्त्रीला शत्रूंकडे दिलं जात होते. प्रजेचे रक्षक त्यांचे भक्षक बनले होते त्यावेळी महाराजांची स्त्रियांचे रक्षण केले, महाराजांनी कल्याणच्या सूनेला नारळाची ओटी भरुन तिला सन्माने परत पाठवले होते हा इतिहास आहे या तिच्या भाषणाने उपस्थितांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivjayantiशिवजयंतीMuslimमुस्लीमWomenमहिला