VIDEO : कोल्हापूरमध्ये उडाली भातकापणीची धांदल
By Admin | Updated: October 20, 2016 13:26 IST2016-10-20T13:24:21+5:302016-10-20T13:26:27+5:30
सध्या ग्रामीण भागात खरीप काढणीची एकच धांदल उडाली आहे

VIDEO : कोल्हापूरमध्ये उडाली भातकापणीची धांदल
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २० - सध्या ग्रामीण भागात खरीप काढणीची एकच धांदल उडाली आहे. परतीच्या पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने बळिराजाची धावपळ उडाली असून शिवारं माणसांनी अक्षरश: फुलली आहेत. भात, भुईमुगाची चांगली वाढ झाली असून पिकांना चांगला उतारा मिळत असून, भाताचे गुंठ्याला दीड पोत्याचे उत्पादन होत आहे.
गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पिके करपून गेली होती. खरीप पिकांना झटका बसल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर पुरेशा पावसाअभावी रब्बीचा हंगामही वाया गेला. जानेवारीनंतर तर पाणीकपातीने शेतकरी कासावीस झाला आणि अशा परिस्थितीत त्याने खरिपाची पेरणी केली. पण जूनपासूनच मान्सूनने दमदार हजेरी लावली. जून ते आॅगस्टपर्यंत एकसारखा पाऊस राहिल्याने भात, भुईमूग पिकांची वाढ जोमात झाली. भाताला पोषक असाच पाऊस राहिल्याने किडीचा प्रादुर्भाव अजिबात झाला नसल्याने पिकांची जोमदार वाढ झाली.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून भात, भुईमूग, सोयाबीन काढणीस सुरुवात झाली आहे. दसºयात परतीच्या पावसाने रोज हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने काढणीत अडथळा निर्माण झाला होता. गेले काही दिवस पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने भातकापणीची एकच धांदल उडाली आहे. दिवाळी तोंडावर असल्याने तत्पूर्वी भातकापणी पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनी गडबड सुरू आहे. पोषक वातावरण राहिल्याने भाताचे उत्पादन चांगले मिळत आहे. शेतकºयाच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘माती मळल्यासारखे भात मळले जात आहे.’ भाताचा गुंठ्याला दीड पोत्याचा उतारा मिळत आहे. गेल्यावर्षीच्या दुष्काळाची भरपाई यावर्षी निघेल असे शेतक-यांचे मत आहे.