शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय दिला, प्रणिती शिंदेचा फडणवीसांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:56 IST

मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता.

नागपूर -  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करत राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला होता. या सभात्यागावरून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. अधिवेशनात विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला तर नातवाने न्याय मिळवून दिला, असे वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समारोपाचे भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली आजी ही विदर्भातील असल्याचे सांगत आपले विदर्भाशी धट्ट नाते असल्याचे सांगितले होते. तोच धागा पकडून प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शेतकरी कर्जमाफीची घोषणा झाल्यावर विदर्भाच्या सुपुत्राने सभात्याग केला. तर नातवाने न्याय मिळवून दिला, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.  ''नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल. कर्जमाफीच्या प्रकियेची सुरुवात ही मार्च महिन्यांपासून होईल. तसेच कर्जमाफीचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी येत्या १५ दिवसांत योजना जाहीर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सभागृहात केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरले. सरकटक कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या घोषणेचे काय झाले असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातून सभात्याग केला होता.    

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस