शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
4
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
5
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
6
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
7
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
8
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
9
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
10
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
11
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
12
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
13
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
14
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
15
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
16
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
17
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
18
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
19
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
20
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड

'या' तीन बाबींमुळे मराठा आरक्षण लढ्याचा विजय मोठा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 11:57 AM

न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य पातळीवर आरक्षणाच्या मुद्दावर निर्माण झालेली जटीलता काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देता आले आहे.

मुंबई - तब्बल २५ वर्षांच्यापासून सुरू असलेला मराठा आरक्षणाची लढाई मराठा समाजाने काही अंशी जिंकली. या लढाईत सर्वसामान्य मराठा सहभागी झाल्यामुळे ही लढाई जिंकण्यास मदतच झाली आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाजातील अनेक संघटना आरक्षणाचा पाठपुरावा करत होत्या. त्यात गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर यश आले. या आरक्षणाच्या लढाईत संघटना, राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्यासह सर्वसामान्य मराठा समाज सहभागी होता. या लाभ मराठा समाजातील दुर्बल घटकांना होणार हे नक्की.

२०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने मराठा आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, वेळीच त्यावर पावले उचलले गेली नसल्याने मराठा समाजाने आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. त्यामुळे लाखोंचे मराठा मोर्चे निघाले. कालातंराने या मोर्चांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. रस्त्यावरची लढाई लढत असताना मराठा समाजातील अनेकांनी सरकारच्या साथीत न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडली. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासंदर्भातील निर्णय देण्यास मदतच झाली.

न्यायालयाच्या निर्णयातील तीन बाबी मराठा आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण ठरल्या. पहिली म्हणजे, न्यायालयात आरक्षण देण्याचा सरकारचा अधिकार वैध ठरणे, ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण अपवादात्मक स्थितीत देता येते हे मान्य होणे, अर्थात तामिळनाडूमध्ये देण्यात आले आहे. आणि तिसरी म्हणजे मराठा समाजाच्या मागासलेपणावर आयोगाने शिक्कामोर्तब करणे होय. या तीन बाबींमुळे मराठा आरक्षणाचा निर्णय मजबूत झाला आहे.

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य पातळीवर आरक्षणाच्या मुद्दावर निर्माण झालेली जटीलता काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देता आले आहे.