शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सांडपाण्यावर भाजीचा मळा

By admin | Updated: April 3, 2017 03:36 IST

कोपरी येथे दहा एकरच्या प्रशस्त जागेवर भाज्यांचा मळा फुलविला जात आहे.

नवी मुंबई : कोपरी येथे दहा एकरच्या प्रशस्त जागेवर भाज्यांचा मळा फुलविला जात आहे. विशेष म्हणजे त्यासाठी सर्रासपणे शेजारच्या मोठ्या गटारातील पाण्याचा वापर केला जात आहे. आरोग्यास हानिकारक असलेल्या या पालेभाज्या शहरातील किरकोळ विक्रेते व लहान-मोठ्या हॉटेल्सला पुरविला जात आहेत. या भाज्यांचे सेवन केल्याने विविध गंभीर स्वरूपाचे आजार बळावण्याची शक्यता आहारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मुंबईसह नवी मुंबईतील रेल्वे मार्गालगतच्या मोकळ्या जागेवर पिकणाऱ्या भाज्यांच्या दर्जाविषयी नेहमीच चर्चा होत आहे. या भाज्या गटाराच्या दूषित पाण्यावर पिकविल्या जात असल्याने त्या आरोग्यास अपायकारक असतात. यात मोठ्याप्रमाणात रासायनिक घटक असल्याने गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता वारंवर तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यानंतरसुध्दा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे विषारी भाज्यांचे हे मळे सुरूच असल्याचे दिसून आले आहे. रेल्वेलगतच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होवू नये, यासाठी रेल्वेने ग्रो मोर फूड योजनेअंतर्गत त्या भाजी पिकविण्यासाठी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. यात बहुसंख्य परप्रांतीय नागरिक आहेत. जागा भाडेतत्त्वावर देताना रेल्वेने काही भाज्यांचा दर्जा राखला जावा, यासाठी काही नियम व अटी घालून दिल्या होत्या. मात्र संबंधितांकडून या नियमाला सपशेल हरताळ फासल्याचे दिसून आले आहे. पालेभाज्या पिकविण्यासाठी सर्रास गटाराच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. कोपरी सेक्टर २६ येथे रेल्वेच्या मालकीची जवळपास दहा एकर मोकळी जागा आहे. रेल्वेने काही वर्षांपूर्वी एका परप्रांतीय नागरिकाला ती भाजी पिकविण्यासाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. या ठिकाणी पालक, मुळा, चवळी, लाल माठ, माठ आदी प्रकारच्या भाज्या पिकविल्या जातात. या पिकासाठी सर्रासपणे गटाराचे पाणी वापरले जात आहे. त्यासाठी एका कोपऱ्या मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यात शेजारच्या नाल्याचे पाणी साठवून ते पिकांना पुरविले जाते. येथे पिकणाऱ्या भाज्या शहरातील किरकोळ विक्रेते व छोट्या उपाहारगृहांना पुरविल्या जात असल्याचे दिसून आले आहे.मुंबईत मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला कारशेड, सायन, माटुंगा, दादर, करीरोड, भायखळा व चिंचपोकळी या स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळालगतच्या दुतर्फा व रुळांच्या मध्ये या भाज्या पिकविल्या जातात. त्यासाठी नजीकच्या गटारातील सांडपाण्याचा वापर केला जातो. तर नवी मुंबईत तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या स्थानकादरम्यान रेल्वे रुळालगतच्या मोकळ्या जागेवर या भाज्यांचे पीक घेतले जाते. त्यासाठी शेजारच्या कारखान्यातून नाल्यात सोडण्यात येणाऱ्या रसायनमिश्रित पाण्याचा वापर केला जातो. सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात लेड, आर्सेनिक, पारा आदी जडधातूंचे प्रमाण असते. या धातूमिश्रित पाण्यावर पिकविलेल्या भाज्या आरोग्यास हानिकारक असतात. या भाज्या खाल्ल्याने त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होवू शकतात. तसेच त्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशाप्रकारे दूषित पाण्यात पिकविल्या गेलेल्या भाज्यांचे सेवन करू नये, असे आहारतज्ज्ञांकडून सांगितले जाते.