शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकरांची टीका; गुजरात हिंसाचाराचा केला उल्लेख, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:02 IST

Prakash Ambedkar News: इतर पक्ष वाटप करतात आणि भाजपा-आरएसएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Prakash Ambedkar News: सीएए आणि एनआरसी दरम्यान तुमच्यासोबत उभे राहिलेल्यांना दुर्लक्षित केले पाहिजे; पैगंबरांच्या अपमानाच्या विरोधात तुमच्यासोबत उभे राहिलेल्यांना दुर्लक्ष करा; मुस्लीम तरुणांची अटक थांबवा, असे म्हणणारे मोबाईल स्टेटस पोस्ट करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे ते म्हणतात. आधी त्रास देणे आणि नंतर सांत्वन मिळवणे ही काही नवीन गोष्ट नाही. मुस्लिम बांधवांनो, जागे व्हा. आपले मित्र आणि आपले शत्रू यातील फरक समजून घ्या, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका

‘सौगात-ए-मोदी’वरून प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर प्रतिक्रिया व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. अलीकडेच वक्फ दुरुस्ती विधेयकाद्वारे मुस्लिमांच्या जमिनींना लक्ष्य केले जात आहे. देशभरात बुलडोझर चालवला जात आहे. सर्व परिस्थिती असूनही, मुस्लिम कोणत्या तोंडाने मोदींची भेट स्वीकारण्यास तयार होत आहेत? येथे हा प्रश्न नंतर सामान्य मुस्लिमांना विचारला जाईल. परंतु, प्रथम प्रश्न त्या मौलवींना आहे, जे या मुद्द्यावर मौन बाळगून आहेत. मौलवी जे निवडणुकीत तज्ज्ञ बनतात आणि कोणाला मतदान करायचे आणि कोणाला करू नये हे सांगतात, असे प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली

"सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली", या म्हणीला साजेशीच ही बाब आहे. या रमजानवेळी मोदींनी ३२ लाख मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा दिल्या. गुजरात हिंसाचारात अनेक मुस्लिम बांधवांचा मृत्यू झाला होता. आता काही गोष्टींचे वाटप करून गोंजारण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच त्यांनी आठवण करून दिली की, तबरेज अन्सारी, मोहम्मद अखलाक, पेहलू खान, जुनेद खान, रकबर खान यांसारखे अनेक मुस्लिम मॉब लिंचिंगचे बळी ठरले आहेत.

दरम्यान, इतर पक्ष वाटप करतात आणि भाजप आरएसएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. १९९९ पासून सत्तेत आल्यापासून ॲंटी मुस्लिम भूमिकेचा स्टॅंड राहिलेला आहे. गोध्रा घडवण्यात आलेले आहे. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिंग केले जाते आणि त्याचे व्हीडिओ आपल्याला मिळतात. मुस्लिमांना साईड ट्रॅक करायचे हा भाजप आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. मात्र, सौगात-ए-मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते. अशात हे राजकीयदृष्टीने केलेला हा कार्यक्रम आहे. देशातून २२ टक्के हिंदू बाहेर जाऊ पाहत आहे, अशात मतदार जात असल्याने हे कृत्य करत आहे. मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन चाललेले आहे. ही प्रेमाची नव्हे तर राजकीय भेट आहे, या शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केला.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी