शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीपेक्षा 'वंचित'च परवडणारे; काँग्रेसमध्ये मतप्रवाह ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 14:55 IST

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाच जागी विजय मिळाला. तर राष्ट्रवादीने चार ठिकाणी विजय मिळवला. आकडेवारीवरून आघाडीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीलाच झाला. तर अनेक मतदार संघात काँग्रेसला राष्ट्रवादीकडून हवी तशी मदत मिळाली नाही.

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातून जोरदार पक्षांतर सुरू आहे. तर सत्ताधारी भाजपमध्ये जाण्यासाठी नेत्यांमध्ये जणूकाही स्पर्धा सुरू झाली आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतून आतापर्यंत ३० हून अधिक नेते सत्ताधारी भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहे. राष्ट्रवादीला दररोज एकापोठापाठ धक्के बसत आहेत. त्यात आता राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीला लागलेली गळती पाहता, काँग्रेसने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी निश्चित मानली जात असली त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. त्यातच नव्याने उदयास आलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडविली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून वंचितला आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यावर वंचितने काँग्रेसला अर्ध्या जागांची ऑफर देत राष्ट्रवादीला दूर ठेवण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या आघाडीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यात भाजप आणि शिवसेनेची मजबूत स्थिती पाहता, राष्ट्रवादीसोबत युती करण्यापेक्षा वंचितला सोबत घेतल्यास पक्षाला फायदा होईल, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये तयार होत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एकाच जागी विजय मिळाला. तर राष्ट्रवादीने चार ठिकाणी विजय मिळवला. आकडेवारीवरून आघाडीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीलाच झाला. तर अनेक मतदार संघात राष्ट्रवादीकडून हवी तशी मदत मिळाली नाही. त्यातच राष्ट्रवादीकडे ग्राउंड लेव्हलवर कार्यकर्त्यांची असलेली कमतरता समोर आली आहे. अशा स्थितीत वंचितसोबत गेल्यास भाजपला टक्कर देणे शक्य होईल, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे.

लोकसभेला अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली नसल्याने राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेसचेही मोठे नुकसान झाले. शिवाय जागाही भाजपने जिंकली. राष्ट्रवादीच्या हटखोर भूमिकेमुळे काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील मुलासह भाजपमध्ये दाखल झाले. तर नगरमध्ये राष्ट्रवादीकडे नेतेच उरले नाहीत. लोकसभेला सामोपचाराने घेतले असते तर, कदाचित चित्र काहीसं वेगळ राहिलं असतं, असंही अनेकांना वाटतं. तर राष्ट्रवादीची विश्वासहार्ता देखील काँग्रेसमध्ये चिंतेचा मुद्दा आहे. २०१४ मध्ये विधानसभा निकालानंतर लगेचच राष्ट्रवादीने भाजपला न मागता पाठिंबा दिला होता. यापुढेही राष्ट्रवादीकडून तसं काही केलं जावू शकतं असा अंदाज बांधला जात आहे.

पडझडीमुळे राष्ट्रवादी हैराणदिग्गजनेते सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मी राष्ट्रवादीसोबतच असल्याचं सांगणारे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेताना दिसतात. त्यानंतर लगेचच पक्षांतराचा मुहूर्त ठरतो. शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे देखील भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. आता राष्ट्रवादीमध्ये मोजकेच अनुभवी नेते उरले आहेत. त्यातून भाजपच्या गळाला कोणी लागणार याची शाश्वती पक्षाध्यक्षांना देखील नाही. एकूणच मोठ्या पडझडीमुळे राष्ट्रवादी पक्ष हैराण झाला आहे.