शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू करा: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 14:27 IST

Param Bir Singh Letter: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे.

ठळक मुद्देराज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे - प्रकाश आंबेडकर अन्यथा हे सर्वपक्षीय आहे असे आम्ही समजू - प्रकाश आंबेडकर राज्यातील हत्यांची चौकशी नाही - प्रकाश आंबेडकर

मुंबई : सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली आहे. (vanchit bahujan aghadi prakash ambedkar demands president rule in maharashtra after governor meet)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गृहमंत्री अनिल देशमुख एकटे निर्णय घेऊ शकत नाहीत. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. राज्यपालांनी रिपोर्ट पाठवला नाही तर हे सर्वपक्षीय आहे, असे आम्ही समजू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; चार पक्षांची राज्यपालांकडे आग्रही मागणी

राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे

पोलिसांचा वापर होत आहे आणि पोलीस आम्हाला राजकीय व्यवस्थेने आदेश दिल्याचे सांगत आहेत. आतापर्यंत १०० कोटी जमा करण्याचे पत्र समोर आले आहे. त्यामधून २,३०० कोटी रुपये जमा करण्यास आल्याचे दिसत आहे. हे पैसे कोणासाठी जमा कऱण्यात आले? यामध्ये एक मंत्री असेल वाटत नाही. पक्षीय स्तरावर हा निर्णय झाला आहे की, मंत्रिमंडळ स्तरावर याचा शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचा असला तर राज्यात राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

हे सर्वपक्षीय आहे असे आम्ही समजू

राज्यपालांनी केंद्र सरकार, राष्ट्रपतींकडे पाठवला पाहिजे आणि काही दिवसांसाठी राजवट लागू करणे गरजेचे आहे. सभागृह बरखास्त करता कामा नये. नवे सरकार आले तर गुन्हेगारी घटक बाहेर ठेवता येईल आणि नव्या व्यवस्थेने राज्य करता येईल अशी परिस्थिती आहे, जर रिपोर्ट गेला नाही तर हे सर्वपक्षीय आहे असं समजू, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना सचिन वाझे यांचा जबाब लोकांसमोर आणला पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली.

राज ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच; देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा

राज्यातील हत्यांची चौकशी नाही

राज्यात राजकारणातील गुन्हेगारी घटक आणि प्रशासनातील गुन्हेगारी घटक एकत्र येऊन राज्याला चालवत असल्याचे दिसत आहे. अनेक गावांमध्ये आदिवासी, अनुसूचित जातींच्या लोकांची हत्या केली जात आहे. पण त्याची साधी चौकशी नाही अशी परिस्थिती आहे, अशी टीका आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरPresident Ruleराष्ट्रपती राजवटPoliticsराजकारण