वाहतुकीचा 'सुटी’ खोळंबा
By Admin | Updated: May 2, 2015 10:21 IST2015-05-02T01:26:35+5:302015-05-02T10:21:52+5:30
महाराष्ट्र दिनाबरोबर जोडून आलेल्या सलग सुट्यांचा लाभ मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांनी घेतला. यावेळी गाड्यांमुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबई-

वाहतुकीचा 'सुटी’ खोळंबा
खालापूर : महाराष्ट्र दिनाबरोबर जोडून आलेल्या सलग सुट्यांचा लाभ मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांनी घेतला. यावेळी गाड्यांमुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे मुंबई- पुणे एक्स प्रेसवे जाम झाला. शिवाय मुंबई - गोवा महामार्गावरील प्रवाशंनााही पाच तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सायन पनवेल महामार्गावरील खारघर टोल नाक्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. गोवा,कोकण, पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या यावेळी मोठी होती. सर्विस रोड उपलब्ध नसल्यामुळे स्थानिकांचा देखिल खोळंबा झाला. सुमारे २ ते ४ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सुट्टीच्या मुढमध्ये असलेल्या पर्यटकाचे मात्र हाल झाले.
शुक्रवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. खालापूर टोलनाक्यापासून माडप बोगद्यापर्यंत जवळजवळ ७ किमी रस्ता या वाहतूक कोंडीमुळे जाम झाला होता.
एक्स्प्रेसवेची निर्मिती झाल्यापासून सुट्यांमध्ये वाहनांची होणारी कोंडी लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ आणि टोल वसुलीसाठी माहीर असलेल्या आयआरबी कंपनीने परिस्थिती हाताळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक होते. त्यांच्या दुर्लक्षामुळे आजही प्रवाशांना अडचण भासत होती. रणरणते ऊनसहन करताना प्रवाशांचे हाल झाले, भुकेलेल्या मुलांच्या पालकांना फूड मॉलकडे जाण्यासाठी पायपीट करावी लागली. एएसआरडीसीचे अधिकाऱ्यांनी यावेळी मदत केली नाही. (वार्ताहर)