शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कर्जमाफी शब्द वापरून शासनाने बहुजनांना गुन्हेगार ठरविले- नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:14 IST

माफी गुन्हेगाराला दिली जाते .कर्जमाफी असे शब्द वापरून शासनाने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार व भूमिपुत्र नाना पटोले यांनी नागभीड येथे केला.

चंद्रपूर: माफी गुन्हेगाराला दिली जाते .कर्जमाफी असे शब्द वापरून शासनाने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार व भूमिपुत्र नाना पटोले यांनी नागभीड येथे केला. येथील कुणबी समाजाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी मंचावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर पाटील गुरूपुडे, समाजाचे जिल्हा अध्यक्ष विजय देवतळे, सभापती रवी देशमुख , पं स. सदस्य संतोष रडके, रागिनी गुरूपुडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, पहिली कर्जमुक्ती संत तुकारामांनी केली. अशी कर्जमुक्ती अपेक्षित होती. सध्याच्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे, स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. पण कोणतेच आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही.उलट बहुजन समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. पण राजीनामा देणारा मी काही पहिलाच नाही. यापूर्वीही जेव्हा बहुजनांवर अन्याय झाला तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला आहे, असेही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन स्वप्नील नवघडे यांनी केले, तर आभार चक्रधर रोहनकर यांनी मानले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले