शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्यात धक्कादायक रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
5
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
6
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
7
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
8
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
9
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
10
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
11
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
12
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
13
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
14
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
15
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
16
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
17
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
18
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
19
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
20
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते

शहरीकरण ही संधीच समजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 05:01 IST

शहरीकरणाकडे संकट म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहिले पाहिजे. गरिबी सामावून घेण्याची सर्वाधिक ताकद शहरांमध्ये आहे. म्हणूनच मागास भागातून शहरांमध्ये स्थलांतर होते. त्यामुळे शहरांचे

पुणे : शहरीकरणाकडे संकट म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहिले पाहिजे. गरिबी सामावून घेण्याची सर्वाधिक ताकद शहरांमध्ये आहे. म्हणूनच मागास भागातून शहरांमध्ये स्थलांतर होते. त्यामुळे शहरांचे सामर्थ्य वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यातून समाजातील शेवटच्या घटकाला त्याचे जीवनमान उंचावण्याची संधी मिळेल आणि नवे विकासपर्व सुरूहोईल. त्यासाठी लोकांच्या सहभागातून सुरू केलेली स्मार्ट सिटी योजना आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत विविध प्रकल्पांचा प्रारंभ शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते. मोदी म्हणाले, ‘‘याआधी देशात काही काम झाले नाही किंवा यापूर्वीच्या सरकारांनी निधी दिला नाही असे अजिबात नाही. तरीही आपल्यानंतर स्वतंत्र झालेले आणि आर्थिकदृष्ट्या कंगाल असलेलेही जगातले कितीतरी देश आपल्यापुढे निघून गेले. खूप आर्थिक दारिद्र्यातूून त्यांनी प्रगती साधली. हे कशामुळे घडले असावे याचे माझ्या मनात सतत मंथन सुरु असते. तेव्हा लक्षात असे आले, की पंचायत ते प्रधानमंत्र्यांपर्यंत सरकारात बसलेल्या बाबूंपेक्षा या देशाचा नागरिक अधिक स्मार्ट आहे. या सव्वाशे कोटी जनतेची ताकद चांगल्या कामासाठी एकवटली तर हा देश वेगाने पुढे निघून जाईल. त्यामुळे स्वच्छता अभियान, स्मार्ट सिटी यासारख्या संकल्पनांचे रुपांतर जनआंदोलनात व्हायला हवे.’’नागरिकांचे जीवनमान सुरक्षित आणि सुखकर करणे हे स्मार्ट सिटी मिशनचे उद्दीष्ट असल्याचे व्यंकय्या नायडू म्हणाले. शहरांचा विकास घडवण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी केवळ विकासाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.स्मार्ट सिटी योजनेमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे निवडण्यात आलेली असली तरी उर्वरीत आठ शहरांमध्ये स्मार्ट सिटीचे उपक्रम राबवण्यास आधीच सुरुवात केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या शहरांसाठी आर्थिक मदत देण्यास जगभरातील अनेक देश उत्सुक आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)शिवसेना, राष्ट्रवादीचा बहिष्कार गेल्या दोन दिवसांपासून महापौरांना व्यासपीठावर स्थान मिळणार की नाही, याबाबत वादंग माजले होते. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावर महापौर कार्यक्रमाला आले आणि त्यांना व्यासपीठावर स्थानही देण्यात आले. मात्र, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. भाजपा वगळता कोणत्याही पक्षाचा नगरसेवक किंवा पदाधिकारीही कार्यक्रमास उपस्थित नव्हता. काळे झेंडे दाखवून काँग्रेसची निदर्शने काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवून शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोर निदर्शने करण्यात आली़ ‘गो बॅक मोदी’, ‘चले जाव, चले जाव नरेंद्र मोदी चले जाव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.पोलिसांनी शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ़ विश्वजित कदम, यांच्यासह २१० जणांना ताब्यात घेतले़ कंपोस्ट खताला अनुदान : शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे़ रासायनिक खतामुळे शेतीचे नुकसान होत असताना हे खत उपयोगी ठरेल़ त्यामुळे हे खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना युरियाप्रमाणेच अनुदान दिले जाईल. खतविक्री केल्याने महापालिकांनाही फायदा होईल. दोन्ही घटकांना त्याचा फायदा होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.