शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरीकरण ही संधीच समजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2016 05:01 IST

शहरीकरणाकडे संकट म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहिले पाहिजे. गरिबी सामावून घेण्याची सर्वाधिक ताकद शहरांमध्ये आहे. म्हणूनच मागास भागातून शहरांमध्ये स्थलांतर होते. त्यामुळे शहरांचे

पुणे : शहरीकरणाकडे संकट म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहिले पाहिजे. गरिबी सामावून घेण्याची सर्वाधिक ताकद शहरांमध्ये आहे. म्हणूनच मागास भागातून शहरांमध्ये स्थलांतर होते. त्यामुळे शहरांचे सामर्थ्य वाढवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यातून समाजातील शेवटच्या घटकाला त्याचे जीवनमान उंचावण्याची संधी मिळेल आणि नवे विकासपर्व सुरूहोईल. त्यासाठी लोकांच्या सहभागातून सुरू केलेली स्मार्ट सिटी योजना आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत विविध प्रकल्पांचा प्रारंभ शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला, या वेळी ते बोलत होते. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगलेल्या या दिमाखदार सोहळ्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, महापौर प्रशांत जगताप उपस्थित होते. मोदी म्हणाले, ‘‘याआधी देशात काही काम झाले नाही किंवा यापूर्वीच्या सरकारांनी निधी दिला नाही असे अजिबात नाही. तरीही आपल्यानंतर स्वतंत्र झालेले आणि आर्थिकदृष्ट्या कंगाल असलेलेही जगातले कितीतरी देश आपल्यापुढे निघून गेले. खूप आर्थिक दारिद्र्यातूून त्यांनी प्रगती साधली. हे कशामुळे घडले असावे याचे माझ्या मनात सतत मंथन सुरु असते. तेव्हा लक्षात असे आले, की पंचायत ते प्रधानमंत्र्यांपर्यंत सरकारात बसलेल्या बाबूंपेक्षा या देशाचा नागरिक अधिक स्मार्ट आहे. या सव्वाशे कोटी जनतेची ताकद चांगल्या कामासाठी एकवटली तर हा देश वेगाने पुढे निघून जाईल. त्यामुळे स्वच्छता अभियान, स्मार्ट सिटी यासारख्या संकल्पनांचे रुपांतर जनआंदोलनात व्हायला हवे.’’नागरिकांचे जीवनमान सुरक्षित आणि सुखकर करणे हे स्मार्ट सिटी मिशनचे उद्दीष्ट असल्याचे व्यंकय्या नायडू म्हणाले. शहरांचा विकास घडवण्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी केवळ विकासाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.स्मार्ट सिटी योजनेमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे निवडण्यात आलेली असली तरी उर्वरीत आठ शहरांमध्ये स्मार्ट सिटीचे उपक्रम राबवण्यास आधीच सुरुवात केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या शहरांसाठी आर्थिक मदत देण्यास जगभरातील अनेक देश उत्सुक आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखविली. (प्रतिनिधी)शिवसेना, राष्ट्रवादीचा बहिष्कार गेल्या दोन दिवसांपासून महापौरांना व्यासपीठावर स्थान मिळणार की नाही, याबाबत वादंग माजले होते. मात्र, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावर महापौर कार्यक्रमाला आले आणि त्यांना व्यासपीठावर स्थानही देण्यात आले. मात्र, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. भाजपा वगळता कोणत्याही पक्षाचा नगरसेवक किंवा पदाधिकारीही कार्यक्रमास उपस्थित नव्हता. काळे झेंडे दाखवून काँग्रेसची निदर्शने काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवून शिवछत्रपती क्रीडा संकुलासमोर निदर्शने करण्यात आली़ ‘गो बॅक मोदी’, ‘चले जाव, चले जाव नरेंद्र मोदी चले जाव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.पोलिसांनी शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डॉ़ विश्वजित कदम, यांच्यासह २१० जणांना ताब्यात घेतले़ कंपोस्ट खताला अनुदान : शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाणार आहे़ रासायनिक खतामुळे शेतीचे नुकसान होत असताना हे खत उपयोगी ठरेल़ त्यामुळे हे खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना युरियाप्रमाणेच अनुदान दिले जाईल. खतविक्री केल्याने महापालिकांनाही फायदा होईल. दोन्ही घटकांना त्याचा फायदा होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.