शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
5
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
6
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
7
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
8
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
9
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
10
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
11
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
12
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
13
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
14
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
15
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
16
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
17
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
18
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
19
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
20
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य

न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे पहिले कर्तव्य : धनंजय चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 07:34 IST

CJI Dhananjay Chandrachud: न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे पहिले कर्तव्य आहे. त्यांनी न्यायालयासंदर्भात समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचविला पाहिजे. त्याकरिता न्यायालय व समाजामधील दुवा म्हणून कार्य करावे.

 नागपूर - न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे पहिले कर्तव्य आहे. त्यांनी न्यायालयासंदर्भात समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचविला पाहिजे. त्याकरिता न्यायालय व समाजामधील दुवा म्हणून कार्य करावे. पीडिताला न्याय देण्यासाठी न्यायालयाला सहकार्य करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या शताब्दी वर्ष समारंभात केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील परिसरामध्ये आयोजित या समारंभाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, राज्याचे महाधिवक्ता ॲड. बिरेंद्र सराफ सन्माननीय अतिथी म्हणून तर, संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे व सचिव ॲड. अमोल जलतारे व्यासपीठावर उपस्थित होते.

न्यायालयांनी जाहीर केलेले निर्णय सार्वजनिक मालमत्ता होतात. त्यानंतर निर्णयांची प्रशंसा होऊ शकते किंवा टोकाचा विरोधही केला जाऊ शकतो. न्यायालयांनी विरोध पचविण्याची तयारी ठेवली पाहिजे. परंतु, बरेचदा वकीलही न्यायालयाच्या निर्णयावर टीका करतात. न्यायप्रविष्ट प्रकरणांवरसुद्धा भाष्य करतात. ही प्रथा चुकीची आहे, याकडे सरन्यायाधीशांनी लक्ष वेधले. वकिली व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्यामुळे आनंद आहे; परंतु, बार कौन्सिल व बार असोसिएशनच्या निवडणुका लढण्यासाठी महिला वकील मोठ्या संख्येत पुढे येत नसल्यामुळे खंतही त्यांनी व्यक्त केली.

नागपूरमधील आठवणींना दिला उजाळासरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नागपूरमधील आठवणींना उजाळाही दिला. नागपूर खंडपीठामध्ये न्यायमूर्ती म्हणून कार्य करतानाचे दिवस खूप आनंदात गेले. तसेच, वकिली करीत असताना ज्येष्ठ विधिज्ञ भाऊसाहेब बोबडे व व्ही. आर. मनोहर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. नागपूरच्या वकिलांची देशभरात प्रतिष्ठा आहे, असे त्यांनी सांगितले. 

नागपूर बारने सर्वोच्च व उच्च न्यायालयाला प्रतिभावंत न्यायमूर्ती दिले. सर्वांनी सर्वोत्तम कार्य करून नागपूरची प्रतिष्ठा वाढविली.- न्या. भूषण गवईनागपूरचे वकील प्रतिभावंत व धाडसी आहेत. बार असोसिएशनच्या विविध उपक्रमांमुळे वकिलांची चांगली जडणघडण होते. ही परंपरा पुढेही कायम राहील.- न्या. शरद बोबडेविधी व्यवसाय महान असून त्याचा कोठेही अवमान होणार नाही, यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. वकील हा न्यायदान प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे.- न्या. देवेंद्रकुमार उपाध्यायनागपूर बार असोशिएशनचा सदस्य असल्याचा गर्व आहे. १०० वर्षे पूर्ण केलेल्या या असोसिएशनच्या सहकार्यामुळेच नागपूर खंडपीठामध्ये सर्वांत कमी प्रकरणे प्रलंबित आहेत.- न्या. नितीन सांबरे

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र