शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे पहिले कर्तव्य : धनंजय चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 07:34 IST

CJI Dhananjay Chandrachud: न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे पहिले कर्तव्य आहे. त्यांनी न्यायालयासंदर्भात समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचविला पाहिजे. त्याकरिता न्यायालय व समाजामधील दुवा म्हणून कार्य करावे.

 नागपूर - न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे पहिले कर्तव्य आहे. त्यांनी न्यायालयासंदर्भात समाजापर्यंत योग्य संदेश पोहोचविला पाहिजे. त्याकरिता न्यायालय व समाजामधील दुवा म्हणून कार्य करावे. पीडिताला न्याय देण्यासाठी न्यायालयाला सहकार्य करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या शताब्दी वर्ष समारंभात केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील परिसरामध्ये आयोजित या समारंभाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, राज्याचे महाधिवक्ता ॲड. बिरेंद्र सराफ सन्माननीय अतिथी म्हणून तर, संघटनेचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे व सचिव ॲड. अमोल जलतारे व्यासपीठावर उपस्थित होते.

न्यायालयांनी जाहीर केलेले निर्णय सार्वजनिक मालमत्ता होतात. त्यानंतर निर्णयांची प्रशंसा होऊ शकते किंवा टोकाचा विरोधही केला जाऊ शकतो. न्यायालयांनी विरोध पचविण्याची तयारी ठेवली पाहिजे. परंतु, बरेचदा वकीलही न्यायालयाच्या निर्णयावर टीका करतात. न्यायप्रविष्ट प्रकरणांवरसुद्धा भाष्य करतात. ही प्रथा चुकीची आहे, याकडे सरन्यायाधीशांनी लक्ष वेधले. वकिली व्यवसायामध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्यामुळे आनंद आहे; परंतु, बार कौन्सिल व बार असोसिएशनच्या निवडणुका लढण्यासाठी महिला वकील मोठ्या संख्येत पुढे येत नसल्यामुळे खंतही त्यांनी व्यक्त केली.

नागपूरमधील आठवणींना दिला उजाळासरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नागपूरमधील आठवणींना उजाळाही दिला. नागपूर खंडपीठामध्ये न्यायमूर्ती म्हणून कार्य करतानाचे दिवस खूप आनंदात गेले. तसेच, वकिली करीत असताना ज्येष्ठ विधिज्ञ भाऊसाहेब बोबडे व व्ही. आर. मनोहर यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. नागपूरच्या वकिलांची देशभरात प्रतिष्ठा आहे, असे त्यांनी सांगितले. 

नागपूर बारने सर्वोच्च व उच्च न्यायालयाला प्रतिभावंत न्यायमूर्ती दिले. सर्वांनी सर्वोत्तम कार्य करून नागपूरची प्रतिष्ठा वाढविली.- न्या. भूषण गवईनागपूरचे वकील प्रतिभावंत व धाडसी आहेत. बार असोसिएशनच्या विविध उपक्रमांमुळे वकिलांची चांगली जडणघडण होते. ही परंपरा पुढेही कायम राहील.- न्या. शरद बोबडेविधी व्यवसाय महान असून त्याचा कोठेही अवमान होणार नाही, यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे. वकील हा न्यायदान प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यांनी नैतिकता जपणे आवश्यक आहे.- न्या. देवेंद्रकुमार उपाध्यायनागपूर बार असोशिएशनचा सदस्य असल्याचा गर्व आहे. १०० वर्षे पूर्ण केलेल्या या असोसिएशनच्या सहकार्यामुळेच नागपूर खंडपीठामध्ये सर्वांत कमी प्रकरणे प्रलंबित आहेत.- न्या. नितीन सांबरे

टॅग्स :Courtन्यायालयMaharashtraमहाराष्ट्र