शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दहावी नापास विद्यार्थ्यांकडून असरचे अशास्त्रीय सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:28 IST

‘असर’चा अहवाल : सोलापूरच्या डिजिटल शिक्षकाचा दावा

मुंबई : राज्यातील शाळांची शैक्षणिक परिस्थिती आणि त्यांचा आढावा घेणारा असरचा अहवाल हा अशास्त्रीय पद्धतीचा असल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीत डिसले यांनी केला आहे. विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यापूर्वी शिक्षक, मुख्याध्यापक, गावच्या सरपंचाची परवानगी घेतली का, तसेच गावांची कोणत्या पार्श्वभूमीवर निवड केली, असे प्रश्न विचारत त्यांनी उपस्थित केले आहेत.

याचसोबत शाळांची पाहणी ही दहावी नापास विद्यार्थ्यांकडून केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. प्रथम संस्थेने किंवा शासनाने शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या केलेल्या पाहणीतून समोर आलेली आकडेवारी सामान्यांसाठी जाहीर करावी, निष्कर्ष मांडू नयेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रणजीत डिसले संयुक्त राष्ट्रांच्या शिक्षण मोहिमेचे सदिच्छादूत म्हणून काम करत आहेत.

सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तींना ६-१४ वयोगटातील मुलांना शिकवण्याचा किती तासांचा अनुभव आहे, मुलांशी संवाद साधत शैक्षणिक कौशल्याबाबत अपेक्षित प्रतिसादाचे कौशल्य या सर्वेक्षकांकडे आहे का? मुलांना वाचता आले नाही किंवा एखादे गणित सोडवता आले की नाही हा निष्कर्ष कोणत्या माहितीच्या आधारे काढला गेला, याचे उत्तर अहवालातून मिळत नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. सोबतच जिल्हा परिषद शाळा, खोमणार येथील शिक्षक दिगंबर तोडकर यांनी पाहणीसाठी आलेल्या कार्यकर्त्याची माहिती विचारली असता त्याने तो दहावी नापास असल्याची कबुली दिल्याचे वास्तव समोर आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे असरच्या पाहणीचे वास्तव आणि त्यातून निघणाºया निष्कर्षावर कसा विश्वास ठेवावा, असा सवाल त्यांनी केला आहे.

असरच्या पाहणीसाठी आलेल्या विद्यार्थी आणि अधिकाºयांकडे गटशिक्षणाधिकारी किंवा सरपंच यांच्याकडचे पत्र नसल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांच्याकडे कोणतीही प्रश्नपत्रिका नव्हती, केवळ शाळा पाहणीसाठी ते प्रतिनिधी असल्याचे सांगत होते. घरी जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी करणार असल्याचे सांगत ते तेथेही गेले नसल्याचे आढळले. त्यामुळे अहवालात केवळ कागदी घोडे नाचविले जाणार असतील तर हे सर्वेक्षण नेमके कशासाठी, हा प्रश्नही अन्य शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला.

यासंदर्भात प्रथमच्या संचालिका उषा राणे यांची प्रतिक्रिया विचारता, या आरोपात काहीही तथ्य नसून सर्वेक्षणास गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याकडे असल्याचे सांगत सर्व विद्यार्थी हे किमान १२ वी पास असून अशास्त्रीय पद्धत सर्वेक्षणास वापरली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Educationशिक्षणSolapurसोलापूर