शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 05:39 IST

दोन्ही परीक्षांसाठी मुंबई, पुणे, धुळे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना माघारी परतावे लागले.

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून रविवारी पीएचडी (पेट) आणि एलएलएम या दोन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. पेटची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा तर एलएलएमची दुपारी ३ ते ४ अशी होती. मात्र, डोंबिवली येथील सुरेखा इन्फोटेक केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे पेट दुपारनंतरही सुरू होऊ शकली नाही. परिणामी दुपारच्या सत्रातील एलएलएम प्रवेश पूर्व परीक्षाही झाली नाही. 

दोन्ही परीक्षांसाठी मुंबई, पुणे, धुळे, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना माघारी परतावे लागले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे डोंबिवली येथील केंद्रावर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, कांदिवली येथील ठाकूर कॉलेजमध्ये १०:३० वाजताची पेट दुपारी १२:३० वाजता सुरू झाली. या परीक्षेसाठी कोणतीही बैठक व्यवस्था नसल्याने एकाच विषयाचे विद्यार्थी बाजूबाजूला बसले होते, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली. तसेच या विलंबामुळे एलएलएम परीक्षाही उशिराने सुरू झाली. दादर येथील आयईएस राजा शिवाजी विद्यालयात विद्यार्थी अतिरिक्त झाल्याने दुपारी ३ ते ४ आणि सायंकाळी ४ ते ५ अशा दोन सत्रांत एलएलएम परीक्षा घेण्यात आली. डोंबिवली केंद्रावर तांत्रिक कारणामुळे ५२६ विद्यार्थ्यांची पेट, तर ५२४ विद्यार्थ्यांची एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षा झाली नाही. या विद्यार्थ्यांची परीक्षा २४ नोव्हेंबरला घेतली जाईल. सुधारित प्रवेशपत्र लॉगिन आणि ई-मेलद्वारे कळविले जाईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षाMumbaiमुंबईMumbai Universityमुंबई विद्यापीठ