शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

“राज ठाकरेंशी सहमत नाही, तामिळनाडूप्रमाणे मराठा आरक्षण दिले तरच...”: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:13 IST

Ramdas Athawale News: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीला सुप्रीम कोर्ट मान्यता देणार नाही, असे सांगत रामदास आठवले यांनी मत मांडले आहे.

Ramdas Athawale News: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. तसेच एकमेकांचे उमेदवार पाडण्याबाबत इशारे दिले जात आहेत. मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून, लक्ष्मण हाकेंसह अन्य ओबीसी आंदोलकही माघार घेताना दिसत नाहीत. मध्यंतरी राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीका होत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या मताशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. 

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीला सर्वोच्च न्यायालय मान्यता देणार नाही. मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेत बदल करणे आवश्यक आहे. सगळ्याच मराठ्यांना बळजबरीने कुणब्यांची दाखले मिळू शकणार नाहीत. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मला आदर आहे. मात्र मनोज जरांगे यांनी पुन्हा पुन्हा मागणी केली तरी त्याला यश येणार नाही, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. 

राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत नाही

राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आर्थिक मागासलेले जो आहे, त्यांना आरक्षण देण्याची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत नाही, असे सांगत, तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षण द्या ही मागणी सर्वोच्च न्यायालयात मान्य होऊ शकते. तामिळनाडूमध्ये ओबीसींच्या दोन गटांना ५० टक्के आरक्षण असून, एका गटाला ३० टक्के तर दुसऱ्या गटाला २० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे मराठा समाजाला तामिळनाडूच्या धर्तीवर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींमधून स्वतंत्र आरक्षण देता येऊ शकेल, असे मला वाटते. मराठा समाजातील गरिबाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, ओबीसींचे आरक्षण आर्थिक निकषावरच आहे आणि ईडब्ल्यूएस हे आर्थिक निकषांवरच आहे. परंतु दलित आणि आदिवासींचे आरक्षण हे जातीच्या आधारावर आहे. त्यामुळे समाजात जोपर्यंत जातिव्यवस्था आहे तोपर्यंत जातीच्या आधारावर आरक्षण मिळाले पाहिजे. गावागावातून जातिव्यवस्था नष्ट झाली तर आर्थिक निकषावर आरक्षणासाठी आम्ही तयार होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील