शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

“मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:02 IST

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Maratha Reservation: जालन्यातील अंतरवालीमधील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तसेच आरक्षणाची मागणी अधिक तीव्रतेने मांडली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आठवडाभरापासून अधिक दिवस उपोषण सुरू आहे. अनेक नेते, मंत्री जालन्यात जाऊन आले. मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. यातच आता मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काही हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलन, आरक्षण या मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

जालन्याच्या अंतरवाली गावात मनोज जरांडे पाटील उपोषणाला बसलेत त्यांची मागणी रास्त आहे. मराठा समाजात मागासलेली कुटुंब आहेत त्यांना आरक्षण द्यावे लागेल. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, असे त्यांचे मत आहे. ओबीसींच्या आरक्षणात वाढ करून मराठा समाजाला त्यात टाकता येत का, हे बघावे किंवा वेगळा विचार होतो का हेही पाहावे, असे स्पष्ट मत रामदास आठवले यांनी मांडले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केलेली टीका ही राजकीय आहे, असे सांगत राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक आहे. जरांडे पाटील यांना भेटून पाठिंबा जाहीर करणार आहे. माझ्या पक्षाची मागणी आहे की, जातीनिहाय जनगणना केली तर सगळ्या जातींचा टक्का समजेल आणि त्यांचा त्यांचा वाटा त्यांना मिळेल. केंद्र सरकारने त्याचा विचार करावा, असे रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, आम्ही सगळे भारतीय आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारत हे नाव ओरिजनल आहे, INDIA हे इंग्रजी नाव आहे, त्याला विरोधकांनी विरोध करणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवले