शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

“मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागेल, ओबीसी कोट्यातून...”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:02 IST

Maratha Reservation: देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Maratha Reservation: जालन्यातील अंतरवालीमधील घटनेनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तसेच आरक्षणाची मागणी अधिक तीव्रतेने मांडली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आठवडाभरापासून अधिक दिवस उपोषण सुरू आहे. अनेक नेते, मंत्री जालन्यात जाऊन आले. मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. यातच आता मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून काही हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलन, आरक्षण या मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. 

जालन्याच्या अंतरवाली गावात मनोज जरांडे पाटील उपोषणाला बसलेत त्यांची मागणी रास्त आहे. मराठा समाजात मागासलेली कुटुंब आहेत त्यांना आरक्षण द्यावे लागेल. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, असे त्यांचे मत आहे. ओबीसींच्या आरक्षणात वाढ करून मराठा समाजाला त्यात टाकता येत का, हे बघावे किंवा वेगळा विचार होतो का हेही पाहावे, असे स्पष्ट मत रामदास आठवले यांनी मांडले आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली

देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी केलेली टीका ही राजकीय आहे, असे सांगत राज्य सरकार आरक्षणाच्या मुद्यावर सकारात्मक आहे. जरांडे पाटील यांना भेटून पाठिंबा जाहीर करणार आहे. माझ्या पक्षाची मागणी आहे की, जातीनिहाय जनगणना केली तर सगळ्या जातींचा टक्का समजेल आणि त्यांचा त्यांचा वाटा त्यांना मिळेल. केंद्र सरकारने त्याचा विचार करावा, असे रामदास आठवले म्हणाले. 

दरम्यान, आम्ही सगळे भारतीय आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारत हे नाव ओरिजनल आहे, INDIA हे इंग्रजी नाव आहे, त्याला विरोधकांनी विरोध करणे चुकीचे आहे, असे रामदास आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRamdas Athawaleरामदास आठवले