शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:24 IST

Maharashtra Political Crisis: बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. कुठे बाळासाहेब आणि उद्धव कुठे, अशी खोचक टीका केंद्रातील भाजप नेत्याने केली आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच भगदाड पडले आहे. पक्ष वाचवण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आता कंबर कसली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

उद्धव ठाकरेंना आरोप करायचे असतील, तर लोकांसमोर जावं, जाहीर भाषण करून करावेत. संजय राऊतांना मुलाखत द्यायची असेल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची घेतली पाहिजे. बंद खोलीत मुलाखत घेतात आणि काहीही बेछूट आरोप करतात. हे आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेनेने भाजपाशी जो दगाफटका केला त्यातून सावरण्यासाठी अशाप्रकारे आरोप केले जात आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी लगावला आहे. 

पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे

पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे. हेच म्हणत होते पंतप्रधान उद्धव ठाकरे बनतील. उद्धव ठाकरे काय बोलतात त्यावर भाजप चालत नाही. उद्धव ठाकरे निराश झाले आहेत. ते आज काय बोलतात, हे उद्या त्यांच्या लक्षात राहत नाही. आम्ही काय करावं, कुठला निर्णय घ्यावा ते आम्हाला सांगू नये. तुम्ही दोघं कोण हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मुलाखत फडणवीस-राज आणि शिंदेंची या सगळ्यांची घ्यावी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंना विचारावी असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही 

एकनाथ शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणतात मग २०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला ते दिसलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन असं वचन दिलं सांगता पण स्वत:चा सार्थ साधत दिलेला शब्द पाळला नाही. सध्या उद्धव ठाकरे नैराश्य झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठे आणि उद्धव कुठे असाही खोचक टीका दानवेंनी केली. 

दरम्यान, ‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले.  काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. मला चिंता आहे ती मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळraosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरे