शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
3
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
4
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
7
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
8
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
9
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
10
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
11
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
12
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
13
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
14
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
16
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
17
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
18
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
19
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
20
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय

‘आम्ही सीमेवर जाऊ’ म्हणण्यामागचा मनोभाव समजून घ्या! - सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 02:33 IST

देश हा सर्वोपरी आहे. देशावर एखादे संकट घोंगावत असेल त्यावेळी रक्षणार्थ एखादी व्यक्ती वा संघटना ‘लष्कराच्या सोबतीने आम्ही सीमेवर जाऊन लढू’ असे विधान करीत असेल तर त्या विधानामागचा त्या व्यक्ती वा संघटनेचा मनोभाव समजून घ्या, अशा शब्दात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी टीकाकारांचे कान टोचले.

नागपूर (भाषाप्रभू पु. भा. भावे साहित्य परिसर) : देश हा सर्वोपरी आहे. देशावर एखादे संकट घोंगावत असेल त्यावेळी रक्षणार्थ एखादी व्यक्ती वा संघटना ‘लष्कराच्या सोबतीने आम्ही सीमेवर जाऊन लढू’ असे विधान करीत असेल तर त्या विधानामागचा त्या व्यक्ती वा संघटनेचा मनोभाव समजून घ्या, अशा शब्दात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी टीकाकारांचे कान टोचले.‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात’ असे विधान अलिकडेच सरसंघचालकांनी केले होते. त्यावर देशभर उलटसुलट चर्चेची राळ उठली असताना सुमित्रा महाजन यांनी त्या वक्तव्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे नागपुरात आयोजित द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. विदर्भ साहित्य संघात आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जलस्रोत मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होत्या.सुमित्रा महाजन म्हणाल्या, सावरकरांच्या विचारांचा जागर मांडणारे हे संमेलन समरसतेचे प्रतीक आहे. सावरकर स्वातंत्र्यानंतर जन्माला आले असते तर ते एक उत्तम साहित्यिकच झाले असते. आज कसे जगायचे, याचे आदर्श उदाहरण शोधायला गेलो तर ते सापडत नाही; पण सावरकरांनी आपल्या कृतीतून असा आदर्श उभा केला आहे. त्यांची स्वातंत्र्याप्रतिची भावना जाज्वल्यपूर्ण होती. आज काही मंडळी म्हणतात, स्वातंत्र्य लढ्यात तुमचे योगदान काय? पण जे म्हणतात त्यांचे प्रत्यक्ष काय योगदान आहे हेही त्यांनी कधी सांगितले पाहिजे.या संमेलनाच्या आयोजनामुळे सावरकर समजून घ्यायला मदत होईल, असा विश्वास स्वागताध्यक्ष कांचन गडकरी यांनी व्यक्त केला.यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ‘जयोस्तुते’ या संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या संमेलनाच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे शिरीष दामले, डॉ. अजय कुळकर्णी, भिकूजी इदाते, रवींद्र साठे, अरुण जोशी, रणजित सावरकर, वामनराव तेलंग, प्रकाश एदलाबादकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजन