शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 06:00 IST

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून एनडीआरएफच्या ४ बोटींसह २१ जवान कोल्हापुरात परत गेले आहेत.

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून एनडीआरएफच्या ४ बोटींसह २१ जवान कोल्हापुरात परत गेले आहेत. पूर ओसरल्यानंतर स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिकेसह अन्य शहरांमधून यंत्रणा दोन्ही जिल्ह्यांच्या मदतीसाठी धावली आहे. पंचगंगेची पातळी धोक्याच्या इशारा पातळीवरून खाली आली आहे.मुंबई महापालिकेसह काही कंपन्यांनी चिखलपाणी काढण्यासाठीची यंत्रे पाठवून दिली आहेत. बुधवारी दुपारी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जिल्हा परिषदेत पूरस्थिती आणि नंतरचे पुनर्वसन याबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली.आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे सलग आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून असून त्यांनी इतर जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणाही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत कामाला लावली आहे. दिवसभरामध्ये पशुसंवर्धन विभागाने २५0 हून अधिक छोटी, मोठी जनावरे शास्त्रीयदृष्ट्या जमिनीमध्ये पुरली.सांगलीचा महापूर गतीने ओसरत असून, बुधवारी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी ३८ फुटांवर म्हणजेच इशारा पातळीखाली आली होती. जलसंपदा विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी यात आणखी पाच फुटाने घट होण्याची शक्यता असल्याने, आज, स्वातंत्र्यदिनी सांगली पूरमुक्त होणार आहे.कोयना धरणातून ३४ हजार ६५७ आणि वारणा धरणातून ३ हजार ९८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असून नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ होण्याची शक्यता नाही. महापूर ओसरत असल्याने पूरग्रस्त घरी परतत आहेत.दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा विचारकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीमध्ये अतिरिक्त होणारे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवण्याबाबत विचार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून याबाबत संशोधन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर