शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 06:00 IST

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून एनडीआरएफच्या ४ बोटींसह २१ जवान कोल्हापुरात परत गेले आहेत.

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून एनडीआरएफच्या ४ बोटींसह २१ जवान कोल्हापुरात परत गेले आहेत. पूर ओसरल्यानंतर स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिकेसह अन्य शहरांमधून यंत्रणा दोन्ही जिल्ह्यांच्या मदतीसाठी धावली आहे. पंचगंगेची पातळी धोक्याच्या इशारा पातळीवरून खाली आली आहे.मुंबई महापालिकेसह काही कंपन्यांनी चिखलपाणी काढण्यासाठीची यंत्रे पाठवून दिली आहेत. बुधवारी दुपारी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जिल्हा परिषदेत पूरस्थिती आणि नंतरचे पुनर्वसन याबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली.आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे सलग आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून असून त्यांनी इतर जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणाही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत कामाला लावली आहे. दिवसभरामध्ये पशुसंवर्धन विभागाने २५0 हून अधिक छोटी, मोठी जनावरे शास्त्रीयदृष्ट्या जमिनीमध्ये पुरली.सांगलीचा महापूर गतीने ओसरत असून, बुधवारी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी ३८ फुटांवर म्हणजेच इशारा पातळीखाली आली होती. जलसंपदा विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी यात आणखी पाच फुटाने घट होण्याची शक्यता असल्याने, आज, स्वातंत्र्यदिनी सांगली पूरमुक्त होणार आहे.कोयना धरणातून ३४ हजार ६५७ आणि वारणा धरणातून ३ हजार ९८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असून नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ होण्याची शक्यता नाही. महापूर ओसरत असल्याने पूरग्रस्त घरी परतत आहेत.दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा विचारकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीमध्ये अतिरिक्त होणारे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवण्याबाबत विचार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून याबाबत संशोधन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर