शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

महिना उलटूनही अकरावी प्रवेशावर अनिश्चिततेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:58 IST

विद्यार्थी, पालक चिंंतेत; यंदाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासह बारावीच्या वर्षावर प्रश्नचिन्ह कायम

मुंबई : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय होईपर्यंत किंवा त्यासंबंधित मार्गदर्शक सूचना येईपर्यंत संपूर्ण राज्यातील अकरावी आणि इतर प्रवेशप्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया थांबवून आज एक महिना होत आला, तरी अद्याप राज्य सरकारने कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा निर्णय न दिल्याने विद्यार्थ्यांचे यंदाचे अकरावीचे व पुढील बारावीचे वर्षच धोक्यात आल्याची चिंता पालक, विद्यार्थ्यांना सतावत आहे.मागील महिन्यात १० तारखेला जाहीर होणारी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणामुळे थांबलेल्या सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी एसईबीसी कोट्यातील प्रवेश इडब्ल्यूएस कोट्यातून करण्याचा निर्णय सुरुवातीला देण्यात आला होता. मात्र, त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील जागांवर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली गेल्याने त्यालाही स्थगिती मिळाली. वर्षाच्या सुरुवातीचे ६ महिने उलटूनही प्रवेश न झाल्याने या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम करायचा कधी? तो पूर्ण कसा करायचा? त्यावर आधारित पुढील महत्त्वाचे असलेल्या बारावीच्या वर्षाचे काय? असे अनेक प्रश्न केवळ विद्यार्थी पालकांपुढे नाही, तर शिक्षक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यापुढेही उभे राहिले आहेत.राज्यात अकरावी प्रवेशाच्या तब्ब्ल ५ लाखांहून अधिक जागा आहेत. त्यातील ३५ हजार ९०० जागा मराठा (एसईबीसी), तर ३२ हजार ५०० जागा आर्थिक दुर्बल (इडब्ल्यूएस ) घटकांसाठी आहेत. मात्र, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत, अकरावी प्रवेशाची सर्व प्रक्रिया खोळंबली आहे. प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार की पहिल्या फेरीतील प्रवेश जैसे थे राहणार, दुसऱ्या फेरीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल होईल का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून, यावर लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.निर्णयाची प्रतीक्षा : अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत. सरकारच्या निर्णयानुसारच त्या अंमलबजावणी प्रक्रियेत समाविष्ट करून प्रवेश प्रक्रिया राबवणे शक्य होईल.- दिनकर पाटील, संचालक, शिक्षण संचालनालय

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण