शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

महिना उलटूनही अकरावी प्रवेशावर अनिश्चिततेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:58 IST

विद्यार्थी, पालक चिंंतेत; यंदाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासह बारावीच्या वर्षावर प्रश्नचिन्ह कायम

मुंबई : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय होईपर्यंत किंवा त्यासंबंधित मार्गदर्शक सूचना येईपर्यंत संपूर्ण राज्यातील अकरावी आणि इतर प्रवेशप्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया थांबवून आज एक महिना होत आला, तरी अद्याप राज्य सरकारने कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा निर्णय न दिल्याने विद्यार्थ्यांचे यंदाचे अकरावीचे व पुढील बारावीचे वर्षच धोक्यात आल्याची चिंता पालक, विद्यार्थ्यांना सतावत आहे.मागील महिन्यात १० तारखेला जाहीर होणारी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणामुळे थांबलेल्या सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी एसईबीसी कोट्यातील प्रवेश इडब्ल्यूएस कोट्यातून करण्याचा निर्णय सुरुवातीला देण्यात आला होता. मात्र, त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील जागांवर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली गेल्याने त्यालाही स्थगिती मिळाली. वर्षाच्या सुरुवातीचे ६ महिने उलटूनही प्रवेश न झाल्याने या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम करायचा कधी? तो पूर्ण कसा करायचा? त्यावर आधारित पुढील महत्त्वाचे असलेल्या बारावीच्या वर्षाचे काय? असे अनेक प्रश्न केवळ विद्यार्थी पालकांपुढे नाही, तर शिक्षक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यापुढेही उभे राहिले आहेत.राज्यात अकरावी प्रवेशाच्या तब्ब्ल ५ लाखांहून अधिक जागा आहेत. त्यातील ३५ हजार ९०० जागा मराठा (एसईबीसी), तर ३२ हजार ५०० जागा आर्थिक दुर्बल (इडब्ल्यूएस ) घटकांसाठी आहेत. मात्र, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत, अकरावी प्रवेशाची सर्व प्रक्रिया खोळंबली आहे. प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार की पहिल्या फेरीतील प्रवेश जैसे थे राहणार, दुसऱ्या फेरीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल होईल का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून, यावर लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.निर्णयाची प्रतीक्षा : अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत. सरकारच्या निर्णयानुसारच त्या अंमलबजावणी प्रक्रियेत समाविष्ट करून प्रवेश प्रक्रिया राबवणे शक्य होईल.- दिनकर पाटील, संचालक, शिक्षण संचालनालय

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण