शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

महिना उलटूनही अकरावी प्रवेशावर अनिश्चिततेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:58 IST

विद्यार्थी, पालक चिंंतेत; यंदाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासह बारावीच्या वर्षावर प्रश्नचिन्ह कायम

मुंबई : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय होईपर्यंत किंवा त्यासंबंधित मार्गदर्शक सूचना येईपर्यंत संपूर्ण राज्यातील अकरावी आणि इतर प्रवेशप्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया थांबवून आज एक महिना होत आला, तरी अद्याप राज्य सरकारने कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा निर्णय न दिल्याने विद्यार्थ्यांचे यंदाचे अकरावीचे व पुढील बारावीचे वर्षच धोक्यात आल्याची चिंता पालक, विद्यार्थ्यांना सतावत आहे.मागील महिन्यात १० तारखेला जाहीर होणारी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणामुळे थांबलेल्या सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी एसईबीसी कोट्यातील प्रवेश इडब्ल्यूएस कोट्यातून करण्याचा निर्णय सुरुवातीला देण्यात आला होता. मात्र, त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील जागांवर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली गेल्याने त्यालाही स्थगिती मिळाली. वर्षाच्या सुरुवातीचे ६ महिने उलटूनही प्रवेश न झाल्याने या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम करायचा कधी? तो पूर्ण कसा करायचा? त्यावर आधारित पुढील महत्त्वाचे असलेल्या बारावीच्या वर्षाचे काय? असे अनेक प्रश्न केवळ विद्यार्थी पालकांपुढे नाही, तर शिक्षक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यापुढेही उभे राहिले आहेत.राज्यात अकरावी प्रवेशाच्या तब्ब्ल ५ लाखांहून अधिक जागा आहेत. त्यातील ३५ हजार ९०० जागा मराठा (एसईबीसी), तर ३२ हजार ५०० जागा आर्थिक दुर्बल (इडब्ल्यूएस ) घटकांसाठी आहेत. मात्र, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत, अकरावी प्रवेशाची सर्व प्रक्रिया खोळंबली आहे. प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार की पहिल्या फेरीतील प्रवेश जैसे थे राहणार, दुसऱ्या फेरीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल होईल का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून, यावर लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.निर्णयाची प्रतीक्षा : अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत. सरकारच्या निर्णयानुसारच त्या अंमलबजावणी प्रक्रियेत समाविष्ट करून प्रवेश प्रक्रिया राबवणे शक्य होईल.- दिनकर पाटील, संचालक, शिक्षण संचालनालय

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण