शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अनधिकृत बांधकामांना अभय, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

By यदू जोशी | Updated: October 7, 2017 05:11 IST

महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील हजारो अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आहे.

मुंबई : महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील हजारो अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आहे. या संदर्भातील अधिसूचना येत्या एकदोन दिवसात निघणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी लोकमतला सांगितले.या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठीच्या नियमावलीची अधिसूचना नगरविकास विभागाने २१ जुलै २०१७ रोजी काढली होती. त्यावर नागरिकांचे सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यातील योग्य सूचनांचा समावेश करून अधिसूचनेचे अंतिम प्रारुप नगरविकास विभागाने निश्चित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यास मान्यता दिली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड, उल्हासनगरसह राज्यातील लहानमोठ्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या अनधिकृत बांधकामे पाडण्याची पाळी आता येणार नाही. अटी, शर्र्तींच्या आधीन राहून ती नियमित करता येतील.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२(क) नुसार अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क (कम्पाऊंडिंग चार्जेस) आकारून नियमित करण्याची तरतूद नवीन नियमावलीत करण्यात आली आहे. अर्थात, सरसकट सर्वच अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार नाहीत. त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. किती रुंदीच्या रस्त्यालगत किती उंचीच्या बांधकामाची परवानगी असेल याचे निकष निश्चित करण्यात आले आहे. त्या निकषानुसार असलेले अनधिकृत बांधकामच नियमित होऊ शकेल. नदी, धरण, कालव्यांसाठीच्या जमिनीवर झालेले अनधिकृत बांधकाम, पूररेषेतील बांधकामे, संरक्षण झोन, हेरिटेज बिल्डिंग, डम्पिंग ग्राऊंड, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात (जसे सीआरझेड, खारफुटी) करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार नाहीत.

बफर झोनमधील अनधिकृत बांधकामे, बांधकामदृष्ट्या असुरक्षित इमारतींतील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार नाहीत. बांधकामाची परवानगी घेताना पर्यावरण विषयक मंजुरीबाबत शासनाचे काही नियम आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करताना सरकारने पर्यावरणविषयक परिणामांचे विश्लेषण केले काय हा वादाचा विषय होऊ शकतो.चटई निर्देशांक (एफएसआय), इमारतीची उंची, मोकळी जागा, छत, रस्त्याच्या रुंदीची अट या बाबत नियमांचे उल्लंघन करून झालेले अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. एकीकडे बिल्डरांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी सरकारने रेरा कायदा आणला. दुसरीकडे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी हे सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील मोठे आव्हान असेल.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस