शत्रूचे प्राण घेऊनच देशाचे रक्षण होते - उमा भारती
By Admin | Updated: August 18, 2016 16:15 IST2016-08-18T16:15:50+5:302016-08-18T16:15:50+5:30
आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानादेखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात.

शत्रूचे प्राण घेऊनच देशाचे रक्षण होते - उमा भारती
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 18 : आपल्या देशाच्या सैन्यदलाची आत्मशक्ती ही इतर कुठल्याही देशातील सैनिकांपेक्षा अधिक आहे. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानादेखील सैनिक आपल्या निश्चयावर अटळ असतात. स्वत:चे बलिदान देऊन देशाचे रक्षण करायला ते सदैव सज्ज असतात. परंतु शत्रूचे प्राण घेऊनदेखील देशाचे रक्षण होऊ शकते, असे मत केंद्रीय जल संसाधन, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केले. गुरुवारी सीआरपीएफच्या जवानांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी जवानांना राख्या न बांधता त्यांना टीका लावून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
पोलीस, सैन्य, अर्धसैनिकदलाचे जवान अडचणींमध्ये काम करत असतात. अनेकदा दुर्गम भागात खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. परंतु तरीदेखील जवान जोमाने देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. या जवानांच्या पाठीमागे आपण सदैव आहोत. वेळ आली तर त्यांच्यासोबत सीमेवरदेखील जायला तयार आहे, असे उमा भारती म्हणाल्या. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही कालावधीपासून तणावाची स्थिती आहे. येथील २ तरुण एका पोलिसाची बंदूक हिसकत असल्याचे दृश्य पाहिले व फार वाईट वाटले. तेथील पोलीस, सैनिक यांच्यात सर्व अडचणींचा सामना करुन देशविरोधी कारवाया करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य आहेत. परंतु त्यांचे हात बांधलेले आहेत. हे पाहून फार दु:ख होते, असे त्या म्हणाल्या.