शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

उल्हासनगर महापालिका शाळेची पटसंख्या अवघी ४ हजारावर; शिक्षण सभापतींचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 6:21 PM

कोरोना काळात महापालिका शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळेची पटसंख्या ४ हजारावर आल्याचा आरोप।महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी केला.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कोरोना काळात महापालिका शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने, शाळेची पटसंख्या ४ हजारावर आल्याचा आरोप।महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी केला. याबाबतचे निवेदन आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना देऊन पटसंख्या वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची निकम यांनी मागणी केली. 

उल्हासनगर महापालिकेच्या शाळा कोरोना संसर्गामुळे बंद असून शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात नसल्याचा आरोप होत आहे. परिणामी शाळेच्या पटसंख्यावर झाल्याचे बोलले जात आहे. शेजारील बदलापूरसह अन्य शहराच्या महापालिका शाळेतील पटसंख्या वाढली. मात्र महापालिका शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी व मुलांत शिक्षणाबाबत आवड निर्माण होण्यासाठी ऑनलाईन शिकवणीद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची संकल्पना शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी निकम यांनी महापालिका प्रशासन अधिकाऱ्या समोर मांडली. सभापती शुभांगी बेहनवाल यांनी शिक्षण मंडळ कार्यालयाला भेट देऊन प्रशासन अधिकारी बी एन मोहिते याच्याशी अन्य अधिकाऱ्या सोबत चर्चा केली. 

महापालिका शाळेत एकेकाळी १२ हजारा पेक्षा जास्त मुलांची पटसंख्या होती. ती ४ हजारावर आल्याने, आश्चर्य व्यक्त आहे. महापालिका शाळेत कोरोना काळात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यास शाळेतील पटसंख्या वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. दरम्यान सभापती शुभांगी निकम यांनी आयुक्तांची भेट घेऊन, तसे निवेदन दिले. तसेच उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रियंका रजपूत यांची भेट घेऊन शिक्षण मंडळाच्या समस्या मांडल्या आहेत. बहुतांश शाळा इमारतीची दुरावस्था झाली असून शाळेच्या जागेवर भूमाफिया अवैधरित्या आरसीसी बांधकामे करीत असल्याची लेखी तक्रार गेल्या आठवड्यात भाजपच्या नगरसेविका कविता गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. याप्रकारने शाळा सुरक्षित नसल्याचे उघड झाले. 

महापालिका शाळा इमारतीच्या जागेवर बांधकामे? दोन वर्षा पूर्वी कॅम्प नं-१ येथील महापालिका शाळेची इमारत पाडून त्याजागी अवैध बांधकामे उभे करण्याचा घाट शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी उधळून लावला होता. शाळा इमारती व त्यांच्या खुल्या जागेवर भूमाफियांचा डोळा असून कॅम्प नं-५ येथील शाळेच्या जागेवर बांधकामे होत असल्याची तक्रार भाजपच्या नगरसेविकेचे लेखी केली. महापालिका शाळा वाचविण्यासाठी अतिक्रमण विभागाने अश्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.