शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

उजनी धरणाची नाबाद ‘सेंच्युरी’

By admin | Updated: August 19, 2016 18:24 IST

‘२०-ट्वेंटी’ हा शब्दप्रयोग आता सर्वत्र परिचित झाला आहे़ हा क्रिकेटमधील शब्द असला तरी उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यातही गेल्या काही दिवसांपासून ‘२०-२०-ट्वेंटी’ सुरू असल्याचे दिसून येत आहे़.

दीड शतकाकडे वाटचाल : शेतकरी आनंदी; ऊस, कांदा लागवडीला वेग
प्रभू पुजारी (पंढरपूर) : ‘२०-ट्वेंटी’ हा शब्दप्रयोग आता सर्वत्र परिचित झाला आहे़ हा क्रिकेटमधील शब्द असला तरी उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यातही गेल्या काही दिवसांपासून ‘२०-२०-ट्वेंटी’ सुरू असल्याचे दिसून येत आहे़. उजनीने आता नाबाद ‘सेंच्युरी’ केली असून दीड शतकाकडे वाटचाल सुरू आहे़ त्यामुळे शेतकरी आता आनंदी झाला असून ऊस व कांदा लागवडीला वेग आला आहे़ 
 
सोलापूर जिल्ह्यात अद्याप मुसळधार पाऊस झाला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे, तलाव, विहिरी, बोअर कोरडे आहेत़ केवळ नीरेतून भीमा नदीत पाणी येत असल्याने ती तेवढी वाहू लागली आहे़ या पाण्यावर शेतकºयांची आणि शहरवासियांची तात्पुरती तहान भागेल, मात्र वर्षभर पुरेल असा पाणीसाठा होण्यासाठी मुसळधार पावसाचीच गरज आहे़ ही गरज परतीचा पाऊस पूर्ण करील, अशी सर्वांची अपेक्षा आहे़ 
 
सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला ही आनंदाची बाब़ पुणे जिल्ह्यातील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग मिसळत होता़  त्यामुळेच क्रिकेटमधील ‘२०-२०-ट्वेंटी’ चा खेळ आणि ‘उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची स्थिती’ सारखीच वाटू लागली होती़ कारण केवळ ४० दिवसांत उजनीने ‘सेंच्युरी’ पार केली आहे़
 
आता तर अधिक ६२ टक्के झाले आहे़  विशेष म्हणजे उजनी धरणाने यंदा निच्चांकी पाणीपातळी गाठली होती़ धरण वजा ५३ टक्के झाले होते़ मायनसचा विळखा लवकर सुटणार नाही, असे वाटत होते़ मात्र उजनीच्या वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरवात झाली अन् ६ आॅगस्ट रोजी मायनसचा विळखा सुटून धरणाची वाटचाल प्लसकडे सुरू झाली़ १३ आॅगस्ट रोजी तर धरण अधिक ५० टक्के भरले़ म्हणजेच वजा ५३ आणि अधिक ५० असे करीत ‘सेंच्युरी’ पूर्ण केली़ आता दीड शतक (धरण १०० टक्के)  केव्हा होतेय याचीच सर्वांनाच उत्सुकता आहे़ 
 
४० दिवसांत ‘सेंच्युरी’-------------
भारतात मान्सून जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर असे ४ महिने असतो़  ४ महिने म्हणजेच १२० दिवस़ त्यातील केवळ ४० दिवसांत (तेही जुलै आणि आॅगस्टमधील) उजनीने सेंच्युरी पार केली़ आता दीड शतकाकडे वाटचाल सुरू आहे़ त्यामुळे यंदा उजनी ‘२०-ट्वेंटी’ ची ही मॅच जिंकून जिल्ह्यातील शेतकºयांना आनंदी करणार यात शंका नाही़