शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:27 IST

Vidhan Parishad: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना बुधवारी सभागृहात निरोप देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल, अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतच दिल्याने माध्यमांना बातम्यांचा एक विषय मिळाला. फडणवीस यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते, तर नजीकच्या भविष्यात आणखी काही धक्कादायक घडणार की काय, अशी चर्चा आमदारांमध्ये रंगली.

 विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना बुधवारी सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी झालेली भाषणे ही एकमेकांची टोप्या उडविणारी आणि सध्याच्या राजकीय गरमागरमीत वातावरण हलकेफुलके करणारी ठरली. फडणवीस म्हणाले, दानवे यांचा कार्यकाळ संपत असला तरी ते पुन्हा सभागृहात आल्यावर त्यांनी याच पदावर काम करावे, असे काही नाही. असे म्हटल्यावर उद्धवजी म्हणतील, आम्ही पळवापळवी करतो. त्यावर उद्धव ठाकरे यांनी समोरच्या बाकावरून टिप्पणी करताच २०२९ पर्यंत तरी आम्ही विरोधकांच्या बाजूला येण्याचा काहीच स्कोप नाही, असेही फडणवीस म्हणाले.

अशा खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या भाषणांमधून आलेली ऑफर त्याच पद्धतीने घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी नंतर दिली.

‘तुम्ही बहुमत सिद्ध केले नाही, आम्ही केले’

फडणवीस यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी दानवे यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. उद्धवजी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पत्र पाठविले. त्यानंतरही कॅबिनेट घेऊन त्याला तुम्ही मंजुरी दिली. राज्यपालांनी पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येत नाही, त्यामुळे ती अधिकृत नव्हती. पण, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. याला उशिरा आलेले शहाणपण म्हणतात. तुम्ही बहुमत सिद्ध केलेले नाही. पण, आम्ही ते सिद्ध केले. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून तो प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करून घेतला, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

‘त्याच पक्षातून पुन्हा येईन असे म्हणा...’

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपच्या मुशीत घडलेला हा कार्यकर्ता दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. आपल्या कारकिर्दीची पहिली टर्म दानवे पूर्ण करत आहेत. त्यामुळे पुन्हा येईन, असे तुम्हीही जोरात म्हणा. या घोषणेला खूप महत्त्व आहे. पण, त्याच पक्षातून पुन्हा येईन, असे म्हणा. दानवेंचे कौतुक ऐकून बरे वाटले. कारण, उमेदवारी जाहीर केली तेव्हा आज कौतुक करणारे वेगळाच चेहरा करून बसले होते. मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. पण, ते मला धन्यवाद देतील की नाही, माहीत नाही. कारण, त्यांनीही माझ्याकडून काही लोक घेतले आहेत, असा चिमटा काढला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस