शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा शंखनाद ?; पालघरमध्ये थेट उमेदवाराचीच घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 19:09 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पालघर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 2019च्या पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी श्रीनिवास वनगांनाच देणार असल्याचा ठाम निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला आहे.पालघरमधल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. साम-दाम-दंड-भेदवाल्यांना सेनेनं घाम फोडला. पैसे वाटणा-यांवर अजून कारवाई का होत नाही. आता नाटकं सुरू आहेत, पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी येत्या निवडणुकांत युती करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.पालघर निवडणुकीतील पराभव खिलाडू वृत्तीने नव्हे, तर कोणत्याच परीने मान्य करायला मी तयार नाही. उन्हामुळे जर यंत्र बंद पडत असतील तर मग चाचण्या कसल्या घेतल्या ?, नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली, याला लोकशाही म्हणतात का ?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या जाहीर सभेत उपस्थित केला आहे. किमान सहा लाखांच्या आसपास भाजपाच्या विरुद्ध मतं पडली.पास वाटताना लोक पकडली याला लोकशाही म्हणतात का ?, एका आदिवासी पोराने केलेला हा तर भाजपाचा पराभव आहे, 15 दिवसांत अडीच लाख मते मिळाली, अजून आता आठ महिने आहेत. 2019ला श्रीनिवास वनगा खासदार झालाच पाहिजे. बुलेट ट्रेन, हायवे, बंदर यासाठी कोण काय बोलत पाहू, यांनी जे वादे मतदानावेळी दिले. काल भेटी झाल्या त्यात सांगितलं शिवसेना जनतेच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या समजून घेतल्या. शेतकऱ्यांचा म्हणणं आहे आमचा रस्त्याला विरोध नाही पण आमच्या जमिनी जात आहेत आयुष्य उधवस्थ होतंय. अनेकांनी जमिनी न देण्याबाबत सांगितलं. रक्त शिंपल्याशिवाय लोकशाही कळत नाही का, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018