शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा शंखनाद ?; पालघरमध्ये थेट उमेदवाराचीच घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 19:09 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पालघर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 2019ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 2019च्या पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी श्रीनिवास वनगांनाच देणार असल्याचा ठाम निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला आहे.पालघरमधल्या शिवसेनेच्या सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. साम-दाम-दंड-भेदवाल्यांना सेनेनं घाम फोडला. पैसे वाटणा-यांवर अजून कारवाई का होत नाही. आता नाटकं सुरू आहेत, पिक्चर अजून बाकी आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी येत्या निवडणुकांत युती करणार नसल्याचे संकेत दिले आहेत.पालघर निवडणुकीतील पराभव खिलाडू वृत्तीने नव्हे, तर कोणत्याच परीने मान्य करायला मी तयार नाही. उन्हामुळे जर यंत्र बंद पडत असतील तर मग चाचण्या कसल्या घेतल्या ?, नाव गायब, बोगस मतदान, यंत्र बिघडली, याला लोकशाही म्हणतात का ?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पालघरच्या जाहीर सभेत उपस्थित केला आहे. किमान सहा लाखांच्या आसपास भाजपाच्या विरुद्ध मतं पडली.पास वाटताना लोक पकडली याला लोकशाही म्हणतात का ?, एका आदिवासी पोराने केलेला हा तर भाजपाचा पराभव आहे, 15 दिवसांत अडीच लाख मते मिळाली, अजून आता आठ महिने आहेत. 2019ला श्रीनिवास वनगा खासदार झालाच पाहिजे. बुलेट ट्रेन, हायवे, बंदर यासाठी कोण काय बोलत पाहू, यांनी जे वादे मतदानावेळी दिले. काल भेटी झाल्या त्यात सांगितलं शिवसेना जनतेच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या समजून घेतल्या. शेतकऱ्यांचा म्हणणं आहे आमचा रस्त्याला विरोध नाही पण आमच्या जमिनी जात आहेत आयुष्य उधवस्थ होतंय. अनेकांनी जमिनी न देण्याबाबत सांगितलं. रक्त शिंपल्याशिवाय लोकशाही कळत नाही का, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018