शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

ठाकरेंच्या आमदाराने हातच जोडले; "चित्रा वाघ यांनी दम दिलाय, मी त्यांना घाबरतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:48 IST

संपूर्ण देशात हिंदु समाजावर अन्याय होतोय म्हणून मोर्चे काढले जातात याचा अर्थ हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदु संकटात आहे असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला.

रत्नागिरी - भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मला दम दिलाय, मी त्यांना घाबरतो असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हातच जोडले. चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावर पत्रकारांनी जाधव यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी भास्कर जाधव यांनी हे विधान केले आहे. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जाधव यांनी भाजपा नेत्यांना चांगलेच फटकारले आहे. 

चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची केलेल्या स्तुतीवर भास्कर जाधव यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आमदार भास्कर जाधव म्हणाले की, अरे बाबा, त्यांच्याबद्दल विचारू नका. त्यांनी मला दम दिलाय माझ्या नादाला लागू नका. त्यामुळे त्यांच्या नादाला लागताना मी घाबरतो असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. 

...मग भाजपाला पुढे पुढे करण्याचं कारण काय? लव्ह जिहादविरोधात हिंदू जनजागृती मोर्चा त्याला कुणाचाही विरोध नाही. परंतु भाजपाचं अशा गोष्टीत नाक खुपसणं ही जुनी गोष्ट. कोणाला तरी पुढे ढकलणे, मतांचे राजकारण करणे, तेढ निर्माण करायचं हे भाजपाचं राजकारण. या मोर्चात शिवसेनेला दोष देण्याचं कारण काय? हिंदू जनजागरण समितीने काढलेल्या मोर्चात भाजपानं पुढे पुढे करण्याचं कारण काय? असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी विचारला आहे. 

ठाकरे म्हणजे हिंदुत्व हेच स्पष्ट झालेदेशात काँग्रेसची राजवट असताना मुस्लीम म्हणायचे इस्लाम खतरे मे है, आज हिंदुत्ववाद्यांची राजवट देशात आहेत. केंद्र-राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहेत म्हणतात आणि संपूर्ण देशात हिंदु समाजावर अन्याय होतोय म्हणून मोर्चे काढले जातात याचा अर्थ हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदु संकटात आहे. मोदी-शाह यांच्या सरकारचं हे अपयश आहे. बरे झाले, भाजपाने या मोर्चानिमित्त आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. हे किती तकलादू आहेत हे समजलं. त्यामुळे ठाकरे म्हणजे हिंदुत्व हे स्पष्ट झाले असंही भास्कर जाधव यांनी सांगितले. 

भाजपा हिंदुत्वाचं रक्षण करू शकत नाहीबोलणारे किती फडतूस आहेत ते सातत्याने मी बोललोय. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा काय अधिकार. बाळासाहेब-उद्धव ठाकरे जोपर्यंत यांच्या पाठिशी उभे नाहीत तोवर यांना असुरक्षित वाटतं. त्यामुळे जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंवर टीका करायची. पण यातून भाजपाचा कमकुवतपणा दिसतोय. हिंदुत्व किती नकली, टाकाऊ आहे हे दिसते. भाजपा हिंदुत्वाचं रक्षण करू शकत नाहीत ते ठाकरेच करू शकतात हे भाजपानं मान्य केले आहे असा टोला जाधवांनी लगावला. 

तर बागेश्वर महाराजने संत तुकाराम यांच्याबद्दल केलेल्या विधानावर भाजपानं तोंड उघडलं नाही. महाराष्ट्रातील युग पुरुष, साधु संत, पुढाऱ्यांचा अपमान करणे हे भाजपाची कार्यकक्षा दिसतेय. त्यामुळे सोयीचं राजकारण सुरू आहे. संत तुकारामांचा इतका मोठा अपमान झाला त्यावर मौन बाळगून भाजपाची सगळी ढोंग उघडी पडतायेत असा आरोप जाधव यांनी केला.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाBhaskar Jadhavभास्कर जाधव