शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ठाकरेंच्या आमदाराने हातच जोडले; "चित्रा वाघ यांनी दम दिलाय, मी त्यांना घाबरतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 18:48 IST

संपूर्ण देशात हिंदु समाजावर अन्याय होतोय म्हणून मोर्चे काढले जातात याचा अर्थ हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदु संकटात आहे असा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला.

रत्नागिरी - भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मला दम दिलाय, मी त्यांना घाबरतो असं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी हातच जोडले. चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावर पत्रकारांनी जाधव यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी भास्कर जाधव यांनी हे विधान केले आहे. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जाधव यांनी भाजपा नेत्यांना चांगलेच फटकारले आहे. 

चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची केलेल्या स्तुतीवर भास्कर जाधव यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा आमदार भास्कर जाधव म्हणाले की, अरे बाबा, त्यांच्याबद्दल विचारू नका. त्यांनी मला दम दिलाय माझ्या नादाला लागू नका. त्यामुळे त्यांच्या नादाला लागताना मी घाबरतो असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. 

...मग भाजपाला पुढे पुढे करण्याचं कारण काय? लव्ह जिहादविरोधात हिंदू जनजागृती मोर्चा त्याला कुणाचाही विरोध नाही. परंतु भाजपाचं अशा गोष्टीत नाक खुपसणं ही जुनी गोष्ट. कोणाला तरी पुढे ढकलणे, मतांचे राजकारण करणे, तेढ निर्माण करायचं हे भाजपाचं राजकारण. या मोर्चात शिवसेनेला दोष देण्याचं कारण काय? हिंदू जनजागरण समितीने काढलेल्या मोर्चात भाजपानं पुढे पुढे करण्याचं कारण काय? असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी विचारला आहे. 

ठाकरे म्हणजे हिंदुत्व हेच स्पष्ट झालेदेशात काँग्रेसची राजवट असताना मुस्लीम म्हणायचे इस्लाम खतरे मे है, आज हिंदुत्ववाद्यांची राजवट देशात आहेत. केंद्र-राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहेत म्हणतात आणि संपूर्ण देशात हिंदु समाजावर अन्याय होतोय म्हणून मोर्चे काढले जातात याचा अर्थ हिंदुत्ववादी सरकारमध्ये हिंदु संकटात आहे. मोदी-शाह यांच्या सरकारचं हे अपयश आहे. बरे झाले, भाजपाने या मोर्चानिमित्त आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. हे किती तकलादू आहेत हे समजलं. त्यामुळे ठाकरे म्हणजे हिंदुत्व हे स्पष्ट झाले असंही भास्कर जाधव यांनी सांगितले. 

भाजपा हिंदुत्वाचं रक्षण करू शकत नाहीबोलणारे किती फडतूस आहेत ते सातत्याने मी बोललोय. उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा काय अधिकार. बाळासाहेब-उद्धव ठाकरे जोपर्यंत यांच्या पाठिशी उभे नाहीत तोवर यांना असुरक्षित वाटतं. त्यामुळे जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेंवर टीका करायची. पण यातून भाजपाचा कमकुवतपणा दिसतोय. हिंदुत्व किती नकली, टाकाऊ आहे हे दिसते. भाजपा हिंदुत्वाचं रक्षण करू शकत नाहीत ते ठाकरेच करू शकतात हे भाजपानं मान्य केले आहे असा टोला जाधवांनी लगावला. 

तर बागेश्वर महाराजने संत तुकाराम यांच्याबद्दल केलेल्या विधानावर भाजपानं तोंड उघडलं नाही. महाराष्ट्रातील युग पुरुष, साधु संत, पुढाऱ्यांचा अपमान करणे हे भाजपाची कार्यकक्षा दिसतेय. त्यामुळे सोयीचं राजकारण सुरू आहे. संत तुकारामांचा इतका मोठा अपमान झाला त्यावर मौन बाळगून भाजपाची सगळी ढोंग उघडी पडतायेत असा आरोप जाधव यांनी केला.  

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघBJPभाजपाBhaskar Jadhavभास्कर जाधव